मुंबई : हिंदुत्वाचा ज्वलंत विषय आणि मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर त्यांना धमकीचे फोन येत असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. यावरून आता त्यांना केंद्राकडून सुरक्षा मिळण्याची शक्यता असून त्याबाबत गृहमंत्र्यांनी त्यावर आता भाष्य केलंय. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेेते सदाभाऊ खोत यांनी त्यावर निशाणा साधला आहे.
“आली रे आली.. पोलखोलीला घाबरून, मोहीम उधळून लावण्याची वेळ आली”
राज ठाकरे यांच्याबाबत केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावर तुमच्या नेत्याच्या घरावर मोर्चा जातोय. तुम्हाला खबरच नसते. जिथं तुम्ही तुमच्या नेत्याला सुरक्षा पुरवू शकत नाही तिथं सामान्य माणसाची काय कशा ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. अलिकडेच एसटी कर्मचारी आंदोलक शरद पवार यांच्या बंगल्यावर धावून गेले होते. त्यावेळी त्यांनी चप्पल आणि दगडफेक केली होती.
मनसेने जाहीर केल्या 3 ठिकाण, 3 तारखा! मनसेची आगामी राजकीय रणनीती ठरतेय
राज्याच्या हिवाळी अधिवेशात विधान परिषदेतील 10 सदस्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला होता. तसेच विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती पत्रावर राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जी विधान परिषदेसाठी पत्राद्वारे जी नावं पाठवली होती. ते पत्र बनावट असल्याचं राज भवनाकडून सांगण्यात आलं आहे. यावरून सदाभाऊ खोत यांनी आली रे आली पोलखोलीला घाबरून. मोहीम उधळून लावण्याची वेळ आली. असं म्हटलं आहे.
मवाळ, ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या, पडळकरांवरील हल्ला, तरी आम्ही शांत अन्..; सदाभाऊ संतापले
दरम्यान, राज्यात जे काही आता सुरू आहे. ती फक्त स्टंडबाजी चालू आहे. पवारांची एसटी कामगार संघटना मोडीत निघाली आहे. त्यामुळेच गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना महाराष्ट्र दर्शन सुरू आहे. एसटी कामगार आपल्या दावणीला यावा म्हणून हे सगळं चाललं आहे. एकप्रकारे हे सरकार आणि पवार साहेब एसटी कामगारांना दहशतवादी असल्याप्रमाणे वागणूक देत आहेत. असंही त्यांनी सांगितलं आहे.
Read also:
- “तेरी भी चुप, मेरी भी चुप म्हणत सत्ताधारी-विरोधी गप्प”; त्यासाठी हुंकार यात्रा
- “ते भोंग्या बिग्यांचं बाजूला ठेवा, आधी महागाईचं बोला; राजू शेट्टींचा राज ठाकरेंना टोला
- “मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार”
- राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र बनावट! नियुक्तीसाठी पाठवलेली ‘ती’ सहा नावं कोणती?
- सरकारचे बारा वाजण्यास फक्त 12 दिवस बाकी..; मनसेच्या ‘त्या’ सभेची जोरदार चर्चा