मुंबई : केंद्रात भाजप सत्तेत येण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनाचा नारा दिला होता. मात्र राज्यात एव्हाना देशात इंधनाच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. महागाईने सर्वसामान्य लोकांचं कंबरडं मोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसने भाजपविरोधात भोंगे वाजवणार असल्याचं काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
भाजपचं सरकार असताना मशिदीवरील भोंगे का उतरवले नाहीत? हिंदु परिषदेचा भाजपला सवाल
सिलेंडरचा भाव हजार रुपयांच्या वर. रॉकेलचा पुरवठा बंद. लाकडेही महाग. मोदीजी, गरीबांनी दोनवेळचा स्वयंपाक करायचा तरी कशावर? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली पाहिजे. देशात महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीवर काय उपाययोजना करणार, असा जाब केन्द्र सरकारला विचारला पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची दुकानं बंद पाडली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
“दंगलीचं काम भाजपने राज्यात दुसऱ्यांकडे सोपवलंय”; राऊतांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
सीएनजी-पीएनजी पाईप गॅसचे दर विक्रमी स्तरावर. गेले आहेत. शहरी गॅस वितरकांना नवा पुरवठा बंद झाला आहे. वीज आणि खत निर्मितीसाठी गॅस कपातीची शक्यता आहे. नव्या शहरांमध्ये विस्तार योजना थंड बस्त्यात गेल्या आहेत. सामान्य जनतेला चुलीच्या धुराशिवाय पर्याय नाही. गॅस, पेट्रोल-डिझेल महाग, हॉटेलिंग बंद, वाहन चालविणे बंद. पूर्वीच्या पैशात निम्मा किराणा. घर चालवणे अशक्य! मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांची महागाईमुळे कोंडी! सर्वकाही आपल्या फकिर पंतप्रधानांना आठ हजार कोटींच्या विमानातून जगप्रवास करता यावा म्हणून मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंच्या सुरक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! गृहमंत्र्यांनी केलं मोठं भाष्य
दरम्यान, महागाईच्या भस्मासुरानमुळे सर्वसामान्य त्राहीमाम! पण मोदी सरकार म्हणते महागाईत ‘किंचित’ वाढ!! असंवेदनशीलतेचा कळस गाठणारे केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर तर कमी करणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेलाच आपल्या सवयी बदलून, अर्धपोटी राहून घर चालवणे भाग पडत आणि भाजपला पराभवातून धडा घेतला पाहिजे. देशातले लोक आता महागाई सहन करणार नाहीत, असं त्यांनी ट्विट केलं आहे.
Read also:
- राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र बनावट! नियुक्तीसाठी पाठवलेली ‘ती’ सहा नावं कोणती?
- सरकारचे बारा वाजण्यास फक्त 12 दिवस बाकी..; मनसेच्या ‘त्या’ सभेची जोरदार चर्चा
- “आली रे आली.. पोलखोलीला घाबरून, मोहीम उधळून लावण्याची वेळ आली”
- मनसेने जाहीर केल्या 3 ठिकाण, 3 तारखा! मनसेची आगामी राजकीय रणनीती ठरतेय
- मवाळ, ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या, पडळकरांवरील हल्ला, तरी आम्ही शांत अन्..; सदाभाऊ संतापले