उस्मानाबाद : एका बाजुला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि दुसरीकडे पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने खासगी वाहनं वापरता येत नाही. हे भोंग्या बिंग्यांचं बाजूला ठेवा आणि राज्यातील परिस्थितीवर बोला, असा टोला राजू शेट्टी यांनी राज्यातील राजकारण्यांना लगावला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज तुळजापुरात हुंकार यात्रेला सुरूवात केली आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषेद मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्य सरकारवर कडाडून टिका केली.
मनसेने जाहीर केल्या 3 ठिकाण, 3 तारखा! मनसेची आगामी राजकीय रणनीती ठरतेय
राजू शेट्टी म्हणाले की, भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत असून सर्वजण आपपल्या धर्माचे पालन करतात. यासाठी जाहीर धार्मिक प्रदर्शन करण्याची गरज नाही. हे भोंग्य बिग्यांचं राजकारण बाजूला ठेवा. याठिकाणी दिवसा वीज नाही. मुलांच्या परिक्षा सुरू आहेत. त्यांना परिक्षेला बसू दिलं जात नाही. ते अगोदर बघा. जनता हैराण झालीय. आधी महागाईचं बोला. प्रत्येकाच्या घरात देवघर आहे. तास तास देवपूजा आणि तुमची देवाची भक्ती करा असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना धारेवर धरलं.
मवाळ, ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या, पडळकरांवरील हल्ला, तरी आम्ही शांत अन्..; सदाभाऊ संतापले
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात निश्चितच टोलवा टोलवी सूरू आहे. कोळशाची टंचाई नाही. खासगी उद्योजकांना कोळसा भेटतो. मग राज्य सरकारला कोळसा कसा भेटत नाही? असा सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला केला आहे. गेल्या महिन्यात ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणतात की तीन दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. कोळसा टंचाईच्या नावाखाली खुल्या बाजारातून 20 ते 21 युनिट दराने वीज खरेदी केली जातेय . कुणाचे तरी खिशे भरण्यासाठी आणि कुणाचा तरी फायदा होण्यासाठी कोळसा टंचाईचा नाटक केलं जातंय, असंही ते म्हणालेत.
भाजपचं सरकार असताना मशिदीवरील भोंगे का उतरवले नाहीत? हिंदु परिषदेचा भाजपला सवाल
दरम्यान, तुमचं राजकारण चुलीत घाला. राज्यात विरोधी पक्ष विरोधकाची भूमिका पार पाडत नाही. जनतेच्या प्रश्नावर चर्चा केली तर दिल्लीत आपले सरकार असल्याने गॅस दरवाढ. इंधनदरवाढ. खत , महागाईबाबत लोक विचारतील याची त्यांना भीती वाटते. तर काही मुलभुत प्रश्न उपस्थित केले तर आघाडीचे अपयश समोर येण्याची भिती सत्ताधाऱ्यांना वाटते. यामुळे दोन्ही गप्प आहेत. तेरी भी चुप, मेरी भी चुप म्हणत एकमेकांवर चिखलफेक करत जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केला जातोय. या सर्व प्रश्नांवर आवाज उठवेल आणि जनतेचा जो दबलेला हुंकार आहे त्याला वाचा फोडेल, म्हणूनच आम्ही हुंकार यात्रा काढली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Read also:
- “ते भोंग्या बिग्यांचं बाजूला ठेवा, आधी महागाईचं बोला; राजू शेट्टींचा राज ठाकरेंना टोला
- “मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार”
- राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र बनावट! नियुक्तीसाठी पाठवलेली ‘ती’ सहा नावं कोणती?
- सरकारचे बारा वाजण्यास फक्त 12 दिवस बाकी..; मनसेच्या ‘त्या’ सभेची जोरदार चर्चा
- “आली रे आली.. पोलखोलीला घाबरून, मोहीम उधळून लावण्याची वेळ आली”