रत्नागिरी : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु अजूनही महाविकास आघाडीतील सरकार राज्यात स्थिर आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील अशीच काहीशी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे सध्या नारायण राणे यांच्याबाबत समाजमध्यामांवर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
“मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार”
नारायण राणे म्हणाले की, आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळं येतात. या वादळात हलणारी झाडं फांद्यासकट कोसळून पडतात. त्याच प्रकारे राज्यात तीन पक्षाचं एक झाड आहे. त्या झाडाच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत. ते खोडावर नाहीयेत. ते जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरून जाणार, अशी नारायण राणे यांनी भविष्यवाणी वर्तवली आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र बनावट! नियुक्तीसाठी पाठवलेली ‘ती’ सहा नावं कोणती?
नारायण राणे यांना खासदार संजय राऊत यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मागील 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेसाठी वादळं नवीन नाहीत. वादळं परतून लावण्याची आणि नवीन वादळं निर्माण करण्याची शिवसेनेची क्षमता महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त शिवसेनेमध्येचे आहे.
सरकारचे बारा वाजण्यास फक्त 12 दिवस बाकी..; मनसेच्या ‘त्या’ सभेची जोरदार चर्चा
दरम्यान, राज्यात आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. राज्यात सध्या भोंग्यांच राजकारण चांगलचं तापलं आहे. यावरून आगामी निवडणुकीत भाजप-मनसे युती करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी वक्तव्य केलं आहे.
Read also:
- “आमच्या रक्तात हिंदूत्त्व, त्यासाठी कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही”; देवेंद्र फडणवीस
- “मी कोणाचे नाव घेत नाही, फक्त टोपी फेकतो”; शरद पवारांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांचा टोला
- “जिथं तुमच्या नेत्याला सुरक्षा पुरवू शकत नाही, तिथं सामान्य माणसाची काय कशा ?”
- “तेरी भी चुप, मेरी भी चुप म्हणत सत्ताधारी-विरोधी गप्प”; त्यासाठी हुंकार यात्रा
- “ते भोंग्या बिग्यांचं बाजूला ठेवा, आधी महागाईचं बोला; राजू शेट्टींचा राज ठाकरेंना टोला