गोंदिया : मुंबई, ठाणे, नाशिक पुण्यासह राज्यातील प्रमुख शहारात आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मार्चा बांधणी सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अलिकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच भाजपचेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुंबई येथील शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावरून निवडणुकांमध्ये मनसे-भाजप युती होणार असल्याचं संकेत होते. मात्र यावर रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी या युतीसंदर्भात महत्वपूर्ण भाष्य केलं आहे.
“जिथं तुमच्या नेत्याला सुरक्षा पुरवू शकत नाही, तिथं सामान्य माणसाची काय कशा ?”
भाजप आणि मनसेची युती होऊ शकत नाही. रिपाइं पक्ष भाजपसोबत असताना त्यांना मनसेची गरज नाही. राज ठाकरे यांचे समर्थन घेणे राजकीय पातळीवर भाजपला महागात पडेल अशा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला आहे. गोंदियात ते एका कार्यक्रमात बोलत होते. त्यामुळे रामदास आठवले यांच्या हे वक्तव्यांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार ते आता पहाणं महत्वाचे ठरणार आहे.
“तेरी भी चुप, मेरी भी चुप म्हणत सत्ताधारी-विरोधी गप्प”; त्यासाठी हुंकार यात्रा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसदर्भात जी भूमिका घेतली आहे. त्याला रिपाइंकडून विरोध देखील केला आहे. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांना मशिदीवरील भोंग्यासंदर्भात रिपाइं समर्थन करीत नाही. तसेच त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून देशात धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शांत महाराष्ट्राला अशांत करण्याचा त्यांचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील संयमी जनता म्हणून पाडेल, असंही ते म्हणाले.
“ते भोंग्या बिग्यांचं बाजूला ठेवा, आधी महागाईचं बोला; राजू शेट्टींचा राज ठाकरेंना टोला
दरम्यान, राज्यात महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून राष्ट्रवादी संवाद यात्रेचं आयोजन केलं आहे. तर शिवसेनेकडून देखील मागील काही दिवसात शिवसंपर्क अभियान चालवलं होतं. काॅंग्रेस देखील या निवडणुकांसाठी राजकीय हालचाली करीत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता आहे. तर भाजप-मनसे युती झाल्यास त्यातून रिपाइं बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Read also:
- “मागील 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलीय”; संजय राऊतांचं राणेंंना प्रत्युत्तर
- “राज ठाकरेंचं सोयी अन् सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व”; मनिषा कांयदे यांचा राज ठाकरेंना टोला
- “उद्धव ठाकरे जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरून जाणार”; नारायण राणेंची भविष्यवाणी
- “आमच्या रक्तात हिंदूत्त्व, त्यासाठी कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही”; देवेंद्र फडणवीस
- “मी कोणाचे नाव घेत नाही, फक्त टोपी फेकतो”; शरद पवारांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांचा टोला