मुंबई : भाजपनेते किरीट सोमय्यांना आयएनएस विक्रांत प्रकरणी अटकपुर्व जामीन मिळाल्यानंतर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना खासदार संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावेळी त्यांनी राज्यात दिलासा घोटाळा सुरू असल्याचं विधान केलं होतं. ते वक्तव्य आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे.
“मी कोणाचे नाव घेत नाही, फक्त टोपी फेकतो”; शरद पवारांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांचा टोला
इंडीयन बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. मागील गेल्या काही दिवसापासून संजय राऊत न्यायव्यवस्थेवर सातत्याने नाराजी व्यक्त करत शंका उपस्थित करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र संजय राऊत त्यांनी केलेल्या विधानांवर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“जिथं तुमच्या नेत्याला सुरक्षा पुरवू शकत नाही, तिथं सामान्य माणसाची काय कशा ?”
त्याबद्दल संजय राऊत म्हणाले की, काही ठराविक पक्षांच्या लोकांनाच दिलासा मिळतो असा पुनरूच्चार केला आहे. त्यामुळे आता या याचिकेवरील सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. किरीट सोमय्यांना अटकपुर्व जामीन मंजूर झाला तेव्हा संजय राऊत म्हणाले की, दिलासा घोटाळा हा न्याय व्यवस्थेला अलिकडेच लागलेला डाग आहे. दिलासा घोटाळा अलकायदा आणि कसाबपेक्षा भयंकर आहे. एकाच पक्षाचे ठग दिलासा घोटाळ्याचे लाभार्थी कसे असू शकतात. हा प्रश्नच आहे. विक्रांत निधी अपहार प्रकरण संपलेले नाही. चोरांना सजा नक्कीच होईल असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.
“तेरी भी चुप, मेरी भी चुप म्हणत सत्ताधारी-विरोधी गप्प”; त्यासाठी हुंकार यात्रा
दरम्यान, आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यातील पैसे हे भाजपला देण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Read also:
- “राज ठाकरेंसोबत भाजप गेल्यास त्यांना महागात पडेल”; रामदास आठवलेंनी दिला इशारा
- “मागील 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलीय”; संजय राऊतांचं राणेंंना प्रत्युत्तर
- “राज ठाकरेंचं सोयी अन् सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व”; मनिषा कांयदे यांचा राज ठाकरेंना टोला
- “उद्धव ठाकरे जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरून जाणार”; नारायण राणेंची भविष्यवाणी
- “आमच्या रक्तात हिंदूत्त्व, त्यासाठी कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही”; देवेंद्र फडणवीस