मुंबई : अटलबिहारी वाजपेयी यांची आज जंयती देशभर साजरी होत असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर नेत्यांकडून अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही अटलबिहारी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राऊत म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्ष्यांचे देशाचे नेते होते. उत्तम संसदपटू, माणुसकी, मानवता काय असते हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य आम्हाला जवळून पाहता आलं. देशाचे नेतृत्व कसा असतं याचा परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून घेता आला.
विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’; अजित पवार नेमके कुणावर भडकले?
“हिंदुत्वाचा विचारधारेशी कधीही तडजोड न करता हा देश सर्वांचा आहे. देशाची एकात्मता कायम टिकली पाहिजे यावर भर देऊन राजकारण केलं. धर्मांधता, जातंधता या दोन शब्दांना दूर ठेवून राजकारण कसं करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं. हिंदुत्वावर भाजप शिवसेनेची युती झाली त्याला अटल बिहारी वाजपेयी यांनी मोठं योगदान दिलं. बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं.’
Read also:
- ही प्रजाती फक्त भंगारात आढळते; डुकराचा फोटो शेअर करत नितेश राणेंनी केली ‘या’ मंत्र्यावर टीका
- २१६ जिवंत व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश; शासनाचा गलथान कारभार की ५० हजारांची लालसा?
- राणेंच्या म्याव म्यावचे विधानसभेत पडसाद; फडणवीस, पवार, मुनगंटीवारांनी टोचले राणेंचे कान
- पवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो; एसटी कामगारांवरून पडळकर बरसले
- महाराष्ट्रातील निवडणुकांवर ओमिक्रॉनचे सावट; विधासभेत चर्चा निवडणूका पुढं ढकलणार ?