नाशिक : नाशिक येथील शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. यानंतर शांतिगिरी महाराज यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देतील की काय ? असेही संकेत दिले जात आहे. परंतु त्याआधीच नाशिक येथील मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभेबाबत ज्या काही चर्चा सुरू होत्या. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी लगाम लावला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप देखील नाशिकच्या जागेसाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीतून नाशिकची जागा आता कोणाच्या वाट्याला जाणार ? असा प्रश्न निर्माण झालाय.
हेही वाचा…“‘मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले’” वसंत मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले
हेमंत गोडसे यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना सांगा की प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण हा नाशिकमध्येच राहिला पाहिजे. मी त्यांना सांगू इच्छितो की आपला धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पुर्ण बहुमताने पाठवायचं आहे. असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी थेट गोडसे यांची उमेदवारी घोषीत केली. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून आणखीच पेच वाढला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकची जागा ही भाजपला हवी आहे. नाशिकच्या जागेसाठी भाजपकडून दिनकर पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला शांतिगीरी महाराज देखील भाजपकडून निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यामुळे हेमंत गोडसे यांनी श्रीकांत शिंदे यांना नाशिकला बोलवून ही जागा शिवसेनेकडेच राहावी, अशा पद्धतीने वक्तव्य करून घेतलं. त्यामुळे आता हेमंत गोडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा…“वसंत मोरे भाऊ तुझी लढाई चालू ठेव ; तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम खुले,” रूपाली पाटलांची पोस्ट व्हायरल
दरम्यान, खासदारकी घोषणा एक सहकारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. महायुतीची यादी ज्यावेळी येईल, तेव्हा अधिकृतरित्या घोषणा होणार आहे. गेली दहा वर्षापासून नाशिकचं प्रतिनिधित्व करत असून नागरिकांना अभिप्रेत काम आपल्याकडून केलं जात आहे.नाशिकमध्ये गेली दहा वर्ष सातत्याने पक्ष संघटन बांधणी, विकासकामे आणि लोकांशी जनसंपर्क ठेवला आहे. त्यामुळेच काल औपचारिक घोषणा काल करण्यात आली. गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये अनेकांची चर्चा सुरू होत्या. त्यामुळे अनेकांना अपेक्षित होतं की, श्रीकांत शिंदे यांनी काही तरी घोषणा करावी, त्यांनी देखील जनतेचा सुर लक्षात घेऊन तसं केलं. शांतिगिरी महाराज यांचा मी सन्मानच करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची बाजू ऐकली घेतली असावी. गेली काही वर्ष याठिकाणी आम्ही कामं करत आहोत. अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीकडून श्रीरंग बारणेंची कोंडी, मावळवर राष्ट्रवादीचा दावा, कार्यकर्ते सरसावरले”
हेही वाचा…“शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्येही चित्र दिसेल”, शिंदे अन् अजित पवार गटाचे नेते एकमेकांत भिडले
हेही वाचा“आधी भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली”, ठाकरेंनी भावना गवळींसह भाजपचा घेतला समाचार
हेही वाचा…“शरद पवारांकडून ‘वसंत मोरें’नी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय ?”
हेही वाचा..संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे..! ठाकरेंकडून थेट प्रचार करण्यास सुरूवात, उद्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन