ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असे म्हणत बारामतीत दोन्ही पवारांना पाडणार असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला. त्यानंतर आता अजित पवार गटातील नेते देखील विजय शिवतारे यांना आवरण्याची भाषा करतांना दिसत आहेत.
हेही वाचा…मनसेने पुण्यातला हिरा गमावला..! वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
शिवसेनेचे नेते सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टिका टिप्पणी करत असतात. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, आपल्या नेत्यांना आवरावे अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल देखील लागू शकतो. असा थेट इशारा अजित पवार गटातील नेते आनंद परांजपे यांनी दिलाय.
हेही वाचा…हरियाणात मोठा भुंकप..! तिकडे एवढासा पक्ष स्वाभिमान दाखवतो, अन् इकडे लोक मुंबई ते दिल्ली विमानाचा डेलीपास काढून बसलेत
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगले वातावरण रहावे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर, शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावे, त्यांना योग्य ती समज द्यावी. आमच्या नेत्यांवर शक्तिस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेत देखील वेगळा निर्णय आणि वेगळे चित्र दिसू शकते. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा“आधी भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली”, ठाकरेंनी भावना गवळींसह भाजपचा घेतला समाचार
हेही वाचा…“शरद पवारांकडून ‘वसंत मोरें’नी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय ?”
हेही वाचा..संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे..! ठाकरेंकडून थेट प्रचार करण्यास सुरूवात, उद्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
हेही वाचा…“‘मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले’” वसंत मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले
हेही वाचा“वसंत मोरे भाऊ तुझी लढाई चालू ठेव ; तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम खुले,” रूपाली पाटलांची पोस्ट व्हायरल