पुणे : माझ्या माणसांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असतील. त्यांच्याबरोबर राहून काय करायचं आहे ? मी त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडेही वेळ मागितली होती. पण राज ठाकरे सुद्धा मला बोलले नाहीत. मला वाटतं अशा पद्धतीने पुणे शहरात राजकारण होणार असेल तर अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं. असे म्हणत वसंत मोरे यांनी आपल्या भावनांवर वाट मोकळी करून दिली. वसंत मोरे यांनी मनसेला कायमचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी देखील आले.
हेही वाचा…“सरकारकडून महिलांची कुचेष्ठा, फुकडच्या साड्या दिल्या पण…” विरोधकांकडून संताप
पुढे बोलतांना वसंत मोरे म्हणाले की, ज्या शहारांमध्ये ज्या लोकांबरोबर माझा राजकीय जीवनातील १५ वर्ष घालवली आहे. पण हेच पदाधिकारी वसंत मोरेला तिकीट मिळायला नको म्हणून पक्ष संघटनेने निवडणुक लढायचा नको असे निगेटिव्ह अहवाल राज ठाकरे यांच्याकडे पाठवले. अशा लोकांसोबत राहणं न बरं. त्यामुळे मी माझ्या सर्व पदाचा राजीनामा दिलाय. तसेच माझ्या स्वत: च्या हातांनी परतीचे दोर कापले आहेत. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा..भाजपची दुसरी यादी..! लोकसभेसाठी मुंडे, मुनगंटीवार अन् भारती पवारांच्या नावांची घोषणा होणार ?
गेल्या दीड-वर्षापासून मी पुणे शहरात लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. माझ्यावर वारंवार माझ्या शहरातीलच काही पदाधिकारी, जे स्वत: इच्छूक नव्हते, पण निवडणुका प्रत्यक्ष जवळ आल्या. त्यावेळेस इच्छूकांची यादी वाढत गेली. जे दोन ते तीन चार जण इच्छूक आहेत. त्यांना राज साहेबांनी लोकसभेची उमेदवारी द्यावी. मी गरज पडल्यास शनिवार वाड्यावर जाईन आणि पुणेकर जी काही भूमिका घेतील. ती मला मान्य असेल. असेही वसंत मोरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा“वसंत मोरे भाऊ तुझी लढाई चालू ठेव ; तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम खुले,” रूपाली पाटलांची पोस्ट व्हायरल
हेही वाचा.मनसेने पुण्यातला हिरा गमावला..! वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
हेही वाचा…हरियाणात मोठा भुंकप..! तिकडे एवढासा पक्ष स्वाभिमान दाखवतो, अन् इकडे लोक मुंबई ते दिल्ली विमानाचा डेलीपास काढून बसलेत
हेही वाचा..“लोकसभेपुर्वी मोठा भुंकप, ‘या’ राज्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा, राजकीय हालचाली वाढल्या”
हेही वाचा…“अजित पवारांवर केलेली टिका शिवतारेंच्या जिव्हारी.,” महायुतीच्या नेत्यांकडून शिवतारेंना दिली समज