मुंबई : दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने अखेर राज्यातील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना जाग आली आहे. त्यानंतर वळसे पाटील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
दहशतवादी हल्याच्या कटातील एक अतिरेकी मुंबईतील टॅक्सीचालक; गृहमंत्री वळसे पाटील कुठे होते?
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीबाबत स्वत: माहिती दिली आहे. दिल्लीत सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. ही संवेदनशील घटना आहे. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल. आताच काही बोलणं योग्य होणार नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. तसेच या बैठकीला पोलिसांच्या सर्व युनिटचे बडे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
‘…तर महाराष्ट्रावर येऊ शकतं अंधाराचं राज्य!’, ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिला इशारा
दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांचा मुंबई लोकलमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा प्लॅन होता अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन सतर्क झालं आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलिसांची एक महत्त्वाची बैठक रेल्वे मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांच्यासह डीआरएमचे मोठे अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रेल्वेच्या सुरक्षेवरही चर्चा होणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा होणार; ठाकरे सरकारविरोधात उद्या भाजपचे राज्यभर आंदोलन
दरम्यान, ज्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली त्यातील एक जण हा धारावीतील रहिवाशी आहे. जान मोहम्ममद शेख असं या आरोपीचं नाव आहे. शेखला अटक करण्यात आल्यानंतर धारावी पोलिसांनी रात्रीच त्याची पत्नी आणि दोन मुलींना ताब्यात घेतलं. जान मोहम्मद शेख कुणाकुणाच्या संपर्कात होता, घरी कोण कोण यायचे, त्यांची नावं काय? घरी येणाऱ्या लोकांना ओळखत होता का? ही लोकं कुठली राहणारी होती? आदी सर्व माहिती त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
डी गँगशी संबंध?
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.
Read Also :
- राज्य महिला आयोगाचा नवा अध्यक्ष कोण? राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांच नाव चर्चेत
- अनिल परबांनी किरीट सोमय्या विरुद्ध ठोकला १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा, सोमय्या आरोप सिद्ध करणार?
- नीती आयोगाशी समन्वय ठेऊन राज्याच्या विकासाला आणखी गती देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली’
- मराठा क्रांती मोर्चा-MIM आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा गाजण्याची शक्यता