औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १७ सप्टेंबरला औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार असून, त्यांचा हा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असून, त्यांच्या नेतृत्त्वात एमएयएमचे कार्यकर्ते विमानतळापासून ते नियोजित कार्यक्रम स्थळापर्यंत शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवादाचे फलक घेऊन आंदोलन करणार आहेत.
सोमैयांनी जमा केले ED कार्यालयात २७०० पानी पुरावे!
दुसरीकडे, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्तेसुद्धा आक्रमक झाले असून, औरंगाबाद दौऱ्याच्या वेळी मुख्यंत्र्यांची गाडी रोखू, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांची गाडी रोखून आरक्षणाशी संबंधित जीआर त्यांची होळी त्यांच्याच समोर करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. त्यामुळे, एकीकडे एमआयएम, तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतल्याने दौरा चर्चेत राहणारा असल्याचे सांगितले जात आहे.
मनसेच्या टार्गेटवर पुन्हा परप्रांतीय? शालिनी ठाकरेंचं गृहमंत्र्यांना १० मागण्यांचं निवेदन
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेकडून शहरात ‘सुपर संभाजीनगर’ पुस्तिकेचे वाटप करण्यात येत आहे. यातून पक्षाकडून शहरात विकासकामे करण्यात आली, त्यांची यादी सांगितली आहे. यावरच एमआयएमकडून निशाणा साधण्यात आला आहे. नागरिकांना ५ दिवसांच्या फरकाने पाणी उपलब्ध होते, काही ठिकाणी गढूळ पाणी येते, राज्य सरकारच्या धोरणामुळे अजूनही असंख्य तरुण बेरोजगार आहेत, यावरून उपरोधात्मकरित्या ‘धन्यवादा’चे बॅनर झळकावून आंदोलन करण्यात येणार आहे.
Read Also :
- परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील माणूस करत नाही का?
- ‘…तर महाराष्ट्रावर येऊ शकतं अंधाराचं राज्य!’, ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिला इशारा
- मोठी बातमी! करुणा शर्मा यांना दिलासा नाही; तुरुगांतील मुक्काम वाढला
- ‘माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार’, दरेकरांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- दरेकरांच्या भाषणबाजीने झाली पक्षाची गोची, आक्षेपार्ह विधानावर पाटील म्हणतात…