मुंबई : गेल्या दोन वर्षांत राज्यावर महापुर, वादळ, अतिवृष्टी आणि करोनाचे संकटं एका मागोमाग येऊन आदळलं. दरम्यान, अजून एका संकटाचे ढग राज्यावर गडद होत असून, राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी त्याबद्दलचे सूतोवाच केले आहे. ‘वीजबिलाची राहिलेली थकबाकी वेळेवर वसुल केली गेली नाही, तर संपूर्ण राज्य अनिश्चित काळासाठी अंधारात जाऊ शकतं,’ असा भीषण इशारा आज माध्यमांसमोर बोलताना नितीन राऊत यांनी दिला आहे.
पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा होणार; ठाकरे सरकारविरोधात उद्या भाजपचे राज्यभर आंदोलन
सध्या राज्यातल्या वीजबिलाची थकबाकी तब्ब्ल ८९ हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी त्यांनी, ‘भाजप सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवल्यामुळे महावितरणवर ही वेळ आली. सरकार सत्तेत आल्यावर करोनाचं संकट आलं. त्यांनतर चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूर या सगळ्या संकटांशी झुंजत असताना वसुली करणे महावितरणला फार शक्य झाले नाही,’ असे त्यांनी सांगितले.
मोठी बातमी! करुणा शर्मा यांना दिलासा नाही; तुरुगांतील मुक्काम वाढला
‘महावितरण राज्य सरकारची महानिर्मिती, केंद्राकडून वीज कंपन्यांसह खासगी वीज कंपन्यांकडून देखील वीज घेऊन, ती राज्यातील वीजग्राहकांना पुरवते. मात्र मागच्या वर्षभरात राज्यातील वीज ग्राहकांनी विजेचे पैसे भरण्यास टाळाटाळ केल्याने, तसेच काहींना शक्य झाले नसल्याने, अशा सगळ्यांची महावितरणची थकबाकी ८९ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे, वीजखरेदीचे पैसे द्यायला महावितरणला विलंब होत आहे,’ असेच राहिले तर राज्य अंधारात जाऊ शकतं,’ अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
Read Also :
- ‘माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार’, दरेकरांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- थोबाड आणि गाल आम्हालाही रंगवता येते; प्रवीण दरेकरांचे रुपाली चाकरणकरांना प्रत्युत्तर
- दरेकरांच्या भाषणबाजीने झाली पक्षाची गोची, आक्षेपार्ह विधानावर पाटील म्हणतात…
- ‘…म्हणूनच पवारांनी राष्ट्रवादीची नवी माडी बांधली,’ दानवेंचा काँग्रेसला जोरदार टोला
- पिंपरी चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप; भाजपचे बडे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार