मुंबई : मागील 4 दिवसांपासून कृषी विधेयकांविरोधात पंजाब-हरियाणामधील शेतकरी दिल्लीच्यी सीमेवर आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आलेला प्रस्ताव देखील फेटाळण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. आता या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे.
केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा व 3 दिवसात यावर तोडगा काढवा असा इशारा बच्चू कडू यांनी केंद्राला दिला आहे.
चलो दिल्ली..
केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा.
३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मि स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकर्यासोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार.#FarmersDilliChalo pic.twitter.com/296WvgEMCf— BACCHU KADU (@RealBacchuKadu) November 30, 2020
बच्चू कडू यांनी ट्विट केले की, केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, दिल्ली- गुरुग्राम बॉर्डरवर शेतकऱ्यांनी चक्काजाम केला असून, हजारो शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहे.