पुणे : शिंदे सरकारमधील आशिष जैस्वाल यांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं अलिकडेच सांगितलं होतं. मात्र अजूनही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील काही खाती तात्पुरत्या स्वरूपात काही मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये सरकारमध्ये थोडी तरी हिमंत असेल तर त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. असा खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.
विधानपरिषद सभापतीपदाची निवडणुक लांबणीवर..! 21 जागा ही झाल्या रिक्त
एकनाथ शिंदे यांच्यात थोडी तरी हिमंत असेल तर त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. परंतु त्यांना भीती आहे की, जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर प्रचंड मारामाऱ्या होतील आणि हे सरकार कोसळणार हे देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या प्रकारे समजलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, आहे त्यावर भागवावं लागेल, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची नरेंद्र मोदींनी घेतली दखल…! एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
ज्या दिवशी खंडपीठासमोर निर्णय होणार त्या दिवशी शिंदे गटातील आमदार निलंबित होतील, हे सर्वांना माहित आहे. मुख्यमंत्री सध्या भितीच्या ताणावाच्या वातावरणात आहे, म्हणून मुख्यमंत्री ज्योतिषाकडे जाणं, गुवाहाटीला जाऊन नवस फेडायला आलो हे सांगणं. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. तसेच त्यांना माहिती आहे की, हे सरकार काही टिकणार नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- नरेंद्र मोदींचं नागपुरात भव्य स्वागत होणार…! उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
- “महिलांचा अपमान करणाऱ्या सत्तारांची हकालपट्टी करा”; उद्धव ठाकरेंची मागणी
- “लंकेंच्या उपोषणाच्या स्थळी अजित पवारांची हजेरी, रस्त्यांची कामे मार्गी लागणार ?”
- “राजकारण हे वाईट नाही, तरुण तरुणींनी राजकारणात यावं”; उद्धव ठाकरेंचं आवाहन
- “अरे काय गोपीचंदा… तुला काही कळतं का ?” अजित पवारांनी पडळकरांचा घेतला समाचार