सातारा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करून राज्यात नवे सरकार स्थापन झालं. मात्र मागील पाच ते सहा महिन्यापासून शिंदे सरकारमधील काही मंत्री गरळ ओकण्याच काम करीत आहेत. ही महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती नाही. यशवंत राव चव्हाण, वसंत पाटील आणि शरद पवार यांच्याकडून आपण काय शिकलो. असा सवाल करीत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंडकखोर आमदारांना खडसावलं.
ज्यांना इतिहास माहिती नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काहीही वक्तव्य करीत आहेत. तसेच येथील महापुरूषांबाबत तुम्हाला बोलण्याचा अधिकार कुणी दिला आहे. ? आपण राज्यापाल आहात. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या राज्यात जावं, असा सल्लाही अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला.
संजय राऊत पुन्हा न्यायालयात..! आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू
अरे काय गोपीचंदा…! असं म्हणत अजित पवारांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टिकास्त्र सोडलं. अफजल खानने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढल्याचं चुकीचं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, एक तर शहाणा आमदार त्यांनी छत्रपतींबाबत चुकीचं वक्तव्य केलं. तुला काही कळतं की नाही, तसेच आमच्या बारामती करांनी तुझं डिपॉझिट जप्त केलं होतं. तरीही बहुमताच्या जोरावर तुला भाजपने आमदार केला. असं म्हणत अजित पवारांनी टोला हाणला.
“सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट, पण त्यांनी जास्त टीका करू नये”; आठवलेंचा सल्ला
दरम्यान, त्यांनी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचाही त्यांनी समाचार घेतला. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाशी तुलना महाराजांच्या आग्रा सुटकेची केली होती. तसेच त्यावरून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरही भाष्य करत चांगली टोलेबाजी केली.
Read also
- विधानपरिषद सभापतीपदाची निवडणुक लांबणीवर..! 21 जागा ही झाल्या रिक्त
- फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची नरेंद्र मोदींनी घेतली दखल…! एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
- “उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी अगोदर प्राथमिक शिक्षण घ्यावे”; चाकणकरांचा खोचक सल्ला
- शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा महाविकास आघाडीचा डाव यशस्वी होणार का ?
- “पंतप्रधानांची भेट घेऊन सुद्धा राज्याचे प्रश्न मांडले नाही हे राज्याचे दुर्दैव” ; सुप्रिया सुळे