मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी अलिकडेच जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणी त्यांना 100 पेक्षा अधिक दिवस तुरूंगात डांबण्यात आलं होतं. आता या प्रकरणात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली असून, याची प्राथमिक सुनावणी आज घेण्यात आली.
“अमित शहांची भेट घ्यायला निघालेले शिंदे गटाचे खासदार दालनाबाहेरूनच परतले, कारण…;”
या सुनावणीच्या वेळी संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्या. आर. एन. रोकडे यांच्या न्यायालयात पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्यासह पाच आरोपी न्यायालयात हजर झाले.
राजकारण तापणार..!”महापुरूषांनी भिक मागून शाळा चालवल्या”, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य
जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी न्यायालयासमोर हजर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी प्रवीण राऊत यांनी या जागेचा FSI परस्पर विकला. यात सुमारे 01 हजार कोटी रूपयांचा व्यवहार होता, असा आरोप करण्यात आला आहे.
“आपल्या माणसांना मारलं जातंय, तरीही आपण एकत्र नाहीत”; राष्ट्रवादीची भाजप-शिंदेंवर टिका
दरम्यान, मागील काही महिन्यापुर्वी गोरेगाव पत्रावाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरण चांगलचं चर्चेत आलं होतं. संजय राऊतांवर इडीने आरोप केल्यानंतर त्यांना तुरूंगात डांबण्यात आलं. मात्र त्यानंतर न्यायालयात मुख्य आरोपी बाहेर असताना तुम्ही निर्दोश व्यक्तीला आत टाकलं असल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने इडीला फटकारलं होतं. त्यानंतर राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला.
Read also
- “सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट, पण त्यांनी जास्त टीका करू नये”; आठवलेंचा सल्ला
- “मनसे मला विरोध करणार नाही”; बृजभूषण सिंह पुण्यात येण्याच्या अगोदर राज ठाकरेंंचे मानले आभार
- “उठ-सूठ महापुरुषांच्या अवमानाचे भाजपने धोरणचं ठरवलंय”; शिवसेनेच्या नेत्याची टिका
- “यामधून चंद्रकांत पाटलांनी आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं”; रोहित पवारांची जहरी टिका
- “महापुरूषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध”;अन् मिटकरी संतापले