मुंबई : महापुरुषांविषयी अपमानास्पद शब्द वापरणे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नातून महाराष्ट्रवर होणारा हल्ला, राज्यातील प्रकल्प परराज्यात पाठवून वाढणारी बेरोजगारी तसेच इतर गंभीर भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने शनिवार,१७ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल या मोर्चाचे आयोजन केले आहे. यातच आता महाराष्ट्रातील खासदार आपली बाजू मांडत असताना त्यांचं संसदेत माईक बंद करण्याचे प्रकार देखील वाढत आहेत. यासंदर्भात आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील खासदार आपली संसदेत आपली बाजू मांडत आहेत. परंतु सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे गटातील खासदारांना चांगलचं खडसावलं आहे.
“बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास नाही”; भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर
महाराष्ट्रच्या मातीतून 48 खासदार लोकसभेत गेले आहेत. जेव्हा-जेव्हा महाराष्ट्राच्या मातीचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा-तेव्हा ह्या 48 खासदारांनी पक्षभिनिवेश विसरून एकत्र यावं ही सगळ्या मराठी जनांची इच्छा आहे. हे त्यांच्या मनात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांना कर्नाटक सरकारने त्रास दिल्यानंतर आणि बोम्मईंच्या आक्षेपार्ह वर्तनानंतर महाराष्ट्राच्या मातीची ती एकी दिसली नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैवं. आपल्या माणसांना मारलं जातंय. आपली माणसं मार खात आहेत आणि तरीही आपण एकत्र येत नाही. अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी खासदारांची कानउघडणी केली.
“महाराष्ट्राची अस्मिता चिरडली जात असतानाही सर्वपक्षीय खासदार एकत्र येत नाहीत हे दुर्दैव”
राज्याची अस्मिता, महान व्यक्तींचा अवमान, सीमाप्रश्न याबाबत राज्यातील खासदार संसदेत एकत्र महाराष्ट्राचा आवाज बुलुंद करतील, ही बेळगाव सीमाभागासह राज्याची अपेक्षा दुर्दैवाने फोल ठरली. सुप्रिया सुळे, विनायक राऊत, अरविंद सावंत यांनी कर्नाटक मुद्यावर आवाज उठवला. तर खासदार अमोल कोल्हे यांनी महान व्यक्तींच्या अवमानाबाबत बोलत असताना त्यांचा माईक बंद केला तरीही राज्यातील सर्वपक्षीय खासदार त्यांच्यामागं उभं राहिलेले दिसले नाहीत. असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सांगितले.
“गुजराती मनावर मोदींची मोहिनी, हीच गुजरातची अस्मिता”; सामनातुन मोदींचं कौतुक
तसेच पुर्वी ओबीसी जनगणनेचा मुद्दा पंकज भुजबळ यांनी मांडला तेव्हा पक्षापलिकडं जाऊन स्व: मुंडे साहेब त्यांच्यामागे ठाम उभे राहिले. परिणामी केंद्राला एसईसीसी चा निर्णय घ्यावा लागला. पण दुर्दैवाने आज तसं दिसलं नाही. मराठा-धनगर आरक्षण, जातनिहाय जनगणना असे अनेक प्रश्न खासदारांनी एकजुट केल्यास सुटू शकतात. पण आज महाराष्ट्राची अस्मिता चिरडली जात असतानाही सर्वपक्षीय खासदार एकत्र येत नाहीत हे दुर्दैव असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांना कर्नाटक सरकारने त्रास दिल्यानंतर आणि बोम्मईंच्या आक्षेपार्ह वर्तनानंतर महाराष्ट्राच्या मातीची ती एकी दिसली नाही हे महाराष्ट्राचं दुर्देवं. आपल्या माणसांना मारलं जातयं, आपली माणसं मार खात आहेत आणि तरिही आपण एकत्र येत नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 9, 2022
Read also
- “पवारसाहेब स्वतः तिकडे येतो, बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली”
- ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी..!उद्धव ठाकरेंकडे 125 कोटी, तर आदित्य ठाकरेंची 11 कोटी संपत्ती
- “मी स्वत:ला राज्यपालचं मानत नाही;” पुण्यात कोश्यारींची मिश्किल टिप्पणी
- राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार..! मनसे काय भूमिका घेणार?
- “राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता कर्नाटक बॅंकेत”, शिंदे-फडणवीसांचा निर्णय, राष्ट्रवादीची जहरी टिका