पुणे : महापुरुषांविषयी अपमानास्पद शब्द वापरणे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नातून महाराष्ट्रवर होणारा हल्ला, राज्यातील प्रकल्प परराज्यात पाठवून वाढणारी बेरोजगारी तसेच इतर गंभीर भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने शनिवार,१७ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल या मोर्चाचे आयोजन केले आहे. यातच आता महाराष्ट्रातील खासदार आपली बाजू मांडत असताना त्यांचं संसदेत माईक बंद करण्याचे प्रकार देखील वाढत आहेत. यासंदर्भात आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
राज्याची अस्मिता, महान व्यक्तींचा अवमान, सीमाप्रश्न याबाबत राज्यातील खासदार संसदेत एकत्र महाराष्ट्राचा आवाज बुलुंद करतील, ही बेळगाव सीमाभागासह राज्याची अपेक्षा दुर्दैवाने फोल ठरली. सुप्रिया सुळे, विनायक राऊत, अरविंद सावंत यांनी कर्नाटक मुद्यावर आवाज उठवला. तर खासदार अमोल कोल्हे यांनी महान व्यक्तींच्या अवमानाबाबत बोलत असताना त्यांचा माईक बंद केला तरीही राज्यातील सर्वपक्षीय खासदार त्यांच्यामागं उभं राहिलेले दिसले नाहीत. असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सांगितले.
नवनीत राणांनी मारला खणखणीत षटकार..! मैदानावर केली तुफान फटकेबाजी
तसेच पुर्वी ओबीसी जनगणनेचा मुद्दा पंकज भुजबळ यांनी मांडला तेव्हा पक्षापलिकडं जाऊन स्व: मुंडे साहेब त्यांच्यामागे ठाम उभे राहिले. परिणामी केंद्राला एसईसीसी चा निर्णय घ्यावा लागला. पण दुर्दैवाने आज तसं दिसलं नाही. मराठा-धनगर आरक्षण, जातनिहाय जनगणना असे अनेक प्रश्न खासदारांनी एकजुट केल्यास सुटू शकतात. पण आज महाराष्ट्राची अस्मिता चिरडली जात असतानाही सर्वपक्षीय खासदार एकत्र येत नाहीत हे दुर्दैव असंही ते म्हणाले.
“आळशी राज्याचं राज्य टिकत नाही,” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
दरम्यान, मागील काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चांगलाचं गाजला आहे. याचे पडसाद संसदेत देखील पडले आहे. तर आगामी काळात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील विरोधी पक्ष चर्चेला आणला जाऊ शकतो. तसेच यावरून विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षातील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न करतील.
Read also
- “गुजराती मनावर मोदींची मोहिनी, हीच गुजरातची अस्मिता”; सामनातुन मोदींचं कौतुक
- शिवसेनेसाठी ठाकरे-शिंदेंमध्ये आरपारची लढाई..! निवडणुक आयोगासमोर जमा केले ढिगभर प्रतिज्ञापत्र
- प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे आघाडीच्या बैठकीत दाखल
- “खेड आळंदी मतदार संघात राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा एल्गार
- जशाचं तसं उत्तर..! फडणवीसांनी बिल्डरची गाडी चालवली, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा तो जुना फोटो