खेड : एका टोकाला भीमाशंकर आणि दुसऱ्या टोकाला आळंदी सारखं देवस्थान असून पण या भागाचा काही विकास झाला नाही. देशातील सर्वात मोठ्या एमआयडीसी आर्थिक दृष्ट्य संपन्न असून देखील खेड आळंदी मतदार संघात पाण्याचा, शेतकऱ्यांचा, महिलांचे प्रश्न प्रलंबित असताना येथील 15 ते 20 वर्षे सत्तेत असणारे राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेसमधील राजकारणी नेते काय करीत होते. असा सवाल आप युवा संवाद मेळाव्यात आप पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, उपाध्यक्ष हरीभाऊ राठोड, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, राज्य संघटक संदीप सोनवणे, पुणे संयोजक मुकूंद किर्दत, यावेळी आप युवा आघाडीचे खेड आळंदी विधानसभा अध्यक्ष मयुद दौंडकर उपस्थित होते.
“कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं, हे मी कबड्डीतून शिकलो”; गिरीश महाजन
चेतन बेंद्र यांनी शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटलांवर देखील हल्लाबोल केला. खेड आळंदी मतदार संघात राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि आता शिवसेनेची सत्ता होती. आढळराव पाटील या भागात आमदार, खासदार म्हणून राहिले आहेत. तर राष्ट्रवादीकडे नगर परिषदेवर एकहाती सत्ता राहिली आहे. परंतु या भागाचा विकास अद्यापही झालेला नाही. आळंदी देवस्थानासाठी कोट्यावधीचा निधी मंजुर करण्यात येतो. मात्र त्याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो असा आरोप देखील चेतन बेंद्रे यांनी केला आहे.
नदी सुधार योजनेवरून त्यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावरही निशाणा साधला आहे. आपल्या भागात तीन मोठ्या नद्या असून तरी देखील काही भागात लोकांना पाणी पिण्यासाठी मिळत नाही. अलीकडेच पर्यावरणाच्या जागृतीसाठी महेश लांडगे यांनी सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन केलं. यासाठी त्यांनी लाखो रूपये खर्च केले. पण आपल्या भागातील नागरिकांच्या पाण्याची समस्या त्यांनी दिसली नाही. त्यामुळे या सर्वांना आता धडा शिकवल्याशिवाय येथील जनता राहणार नाही. तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या सर्वच निवडणुका आम्ही लढविणार असून यामध्ये यशस्वी होऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“गडकरींनी गोपीनाथ मुंडेंना जसं ट्रॅपमध्ये अडकवलं, तसेच फडणवीस पंकजा मुंडेंना..” अंधारेंचा गंभीर आरोप
दरम्यान, महाराष्ट्र राज्य खेड आळंदी विधानसभा अंतर्गत आम आदमी पार्टी युवा आघाडीकडून आज आप युवा संवाद संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. लोकांच्या, समाजाच्या मुलभूत प्रश्नांकडे सध्या राजकारणातील नेते मंडळी कानडोळा करीत आहेत.. त्यासाठी समजाकारणात स्वत: पुढाकर घेऊन समाजाचं नेतृत्व करणे सध्याच्या घडीला अत्यावश्यक आहे. त्यामुळे आप युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचं मत खेड आळंदी विधानसभा मतदार संघाचे आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर यांनी व्यक्त केले आहे.
Read also
- जशाचं तसं उत्तर..! फडणवीसांनी बिल्डरची गाडी चालवली, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा तो जुना फोटो
- “अरे वसंतराव….कधी येणार आमच्याकडे, वाट पाहतोय”; अजित पवारांनीच राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली…! वसंत मोरे
- नवनीत राणांनी मारला खणखणीत षटकार..! मैदानावर केली तुफान फटकेबाजी
- “आळशी राज्याचं राज्य टिकत नाही,” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- “वाचाळवीरांना बुद्धी यावी, यासाठी ठाकरे गटाचं ‘जागरण गोंधळ’ आंदोलन”