पुणे : मागील काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं आहे. तसेच मागील काही काळात राज्यातील मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालाचं वक्तव्य, महाराष्ट्रातून बाहेर गेलेले प्रकल्प या सर्व मुद्दयांवरून महाविकास आघाडी राज्यात महामोर्चा काढणार आहे. याच मुद्यांच्या संदर्भात काल विरोधी पक्षातील खासदारांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षातील खासदारांवर टिका केली आहे.
“यामधून चंद्रकांत पाटलांनी आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं”; रोहित पवारांची जहरी टिका
पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा राज्याच्या वतीने ईडी सरकारमधील लोकसभा सदस्यांपैकी कोणीही सीमाप्रश्न अथवा इतर प्रश्न मांडले नसतील तर ते राज्याचे दुर्दैव आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडी सरकारवर टीका केली. ईडी सरकारमधील सत्तेत असलेल्या सदस्यांपैकी एकाही सदस्याने पार्लमेंट सुरू होऊन तीन दिवस उलटून देखील राज्यातील कोणत्याही विषयाबद्दल बोलेलं माझ्या कानावर आलेलं नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्यातील इतर प्रश्नांवर अतिशय असंवेदनशीलपणे ईडी सरकार वागत आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
“महापुरूषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध”;अन् मिटकरी संतापले
तसेच पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या चर्चेमध्ये सर्वपक्षीय सहभाग अपेक्षित होता जर एकत्रितपणे गेलो असतो तर जास्त योग्य ठरले असते. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करायला हवी होती. यापूर्वी अशा काही घटना घडल्या की तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षपात न करता राज्य ही पहिली अशी भूमिका घेतली. मात्र विद्यमान सरकारमधील मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री राज्याच्या हितासाठी कुठेही विरोधी पक्षाला विश्वासात घेताना दिसत नाही. सीमाप्रश्नाचा वाद चिघळला त्यावेळी पहिले चोवीस तास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नाहीत व चूकीच्या गोष्टींची पाठराखण करत आहेत हे राज्याचे दुर्दैव आहे असे त्या म्हणाल्या.
Read also
- “चड्डी गॅंगनी कितीही प्रयत्न केला, तरी बहुजन महापुरूषांची उंची कमी होणार नाही”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- संजय राऊत पुन्हा न्यायालयात..! आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू
- “सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट, पण त्यांनी जास्त टीका करू नये”; आठवलेंचा सल्ला
- “मनसे मला विरोध करणार नाही”; बृजभूषण सिंह पुण्यात येण्याच्या अगोदर राज ठाकरेंंचे मानले आभार
- “उठ-सूठ महापुरुषांच्या अवमानाचे भाजपने धोरणचं ठरवलंय”; शिवसेनेच्या नेत्याची टिका