मुंबई : महापुरूषांविषयी अपमानास्पद शब्द वापरणे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नातून महाराष्ट्रावर होणारा हल्ला, राज्यातील प्रकल्प परराज्यात पाठवून वाढणारी बेरोजगारी तसेच इतर गंभीर भूमिकेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने शनिवार, दिनांक 17 डिसेंबर रोजी मुंबई येथे “महा मोर्चाचे” आयोजन केले आहे. शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या हल्लाबोल मोर्चाची घोषणा केलीय. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुढे चांगलचं गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच नागपुर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा महाविकास आघाडीचा हा डाव यशस्वी होणार का ? त्याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत.
“उठ-सूठ महापुरुषांच्या अवमानाचे भाजपने धोरणचं ठरवलंय”; शिवसेनेच्या नेत्याची टिका
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने राज्यातील आघाडी सरकार कोसळलं. अन् उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची घेतली खरी, पण त्यानंतर त्यांची खरी परिक्षा सुरू झाली. पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी आघाडी सरकारने शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावरच ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा देण्यात सुरूवात केली. यातच ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, ईडी सरकार हाय हाय, अशा घोषणाही त्यावेळी विरोधकांकडून देण्यात आल्या. मात्र पन्नास खोके एकदम ओक्के ही घोषणा उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी बंडखोरांवर एक अस्त्र म्हणून वापरली. याकाळात संजय राऊत यांना तुरूंगास भोगावला लागला. तर आव्हांडाना अटक करण्यात आली. अशा घटना घडत असताना महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेल्याने सत्ताधारी- विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योराप सुरू झालेत. यातच मग राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.
“यामधून चंद्रकांत पाटलांनी आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं”; रोहित पवारांची जहरी टिका
त्यावरून राज्यातील नेत्यांनी राज्यपालांवर सडकून टिका केली. तर खासदार उदयन राजे यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यपालांना महाराष्ट्रातून हद्दपार करा, अशी मागणी केली. त्याच काळाच्या दरम्यान, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, या शिंदे सरकारमधील मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आली. त्यावरून राष्ट्रवादीने मैदानात उतरून जाहीर निषेध केला. ही काही वक्तव्ये राज्याच्या राजकारणातून बाजूला पडत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत तालुक्यातील 40 गावांवर दावा ठोकला. अन् राज्यात मोठा वाद निर्माण झाला. आता हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात गेलाय. काल विरोधी पक्षातील खासदारांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेनेचे खासदार, अरविंद सावंत, राजन साळवी, प्रियंका चतुर्वेदी, तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे आदी खासदार उपस्थित होते. अमित शहा यांच्या भेटीला जाताना सीमावादावर एकीचं दर्शन घडवणाऱ्या सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न फोल ठरला. यावेळी शिंदे गटाच्या खासदारांनाही सोबत येण्याचं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर धैर्यशील माने, श्रीरंग बारणे सोबत यायला निघाले, पण ठाकरे गटाच्या खासदारांनी आक्षेप घेतल्याने दालनाबाहेरूनच ते परतले. त्यानंतर शिंदे-भाजपमधील खासदारांवर यावरून टिका करण्यात आली.
“महापुरूषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध”;अन् मिटकरी संतापले
यातच आता शिंदे-फडणवीस सरकारचा नागपुर येथे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याआधी महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवली जात आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन दाखवले पाहिजे. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केलीय. महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही, तसेच महाराष्ट्र द्वेशांना धडा शिकवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केले आहे.
आता या सर्वांनामध्ये महाविकास आघाडीला याचा फायदा होईल का ? असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आलं असेल. तर आगामी काही काळात स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, विधानसभा, आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका राज्यात होणार आहे. सध्या भाजप-शिंदे गट एकत्रित आहेत. त्याला मनसेचीही काही अधिक साथ आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, आणि काॅंग्रेस यांच्यासह आता वंचितची आघाडीमध्ये येण्याची शक्यता आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 105 उमेदवारांच्या गळ्यात विजयी माळ पडली, तरी त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. तर 56 आमदारांच्या बळावर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी, अन् काॅंग्रेसची युती करत सत्ता स्थापन केली. आता शिंदे- भाजप अन् काही अपक्ष आमदार मिळून शिंदे-फडणवीसांची सत्ता अस्तित्वात आहे.
त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला नमवायचं असेल तर महाविकास आघाडीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा महाविकास आघाडीचा मोठा डाव असणार, यात काही शंका नाही. तसेच मागच्या पावसाळी अधिवेशनात पन्नास खोक्के एकदम ओक्के ही घोषणा जशी राज्यभरात चर्चेत आली होती. तशीच घोषणा हिवाळी अधिवेशनात बघायला मिळणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “पंतप्रधानांची भेट घेऊन सुद्धा राज्याचे प्रश्न मांडले नाही हे राज्याचे दुर्दैव” ; सुप्रिया सुळे
- “चड्डी गॅंगनी कितीही प्रयत्न केला, तरी बहुजन महापुरूषांची उंची कमी होणार नाही”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- संजय राऊत पुन्हा न्यायालयात..! आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू
- “सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट, पण त्यांनी जास्त टीका करू नये”; आठवलेंचा सल्ला
- “मनसे मला विरोध करणार नाही”; बृजभूषण सिंह पुण्यात येण्याच्या अगोदर राज ठाकरेंंचे मानले आभार