मुंबई :- भाजपविरोधात एक मजबूत आघाडी तयार करण्याच्या उद्देशाने काँग्रेस वगळता इतर विरोधी पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. भाजप विरोधी पक्षांमध्ये आता शिवसेनाही सहभागी झाली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच ममता बॅनर्जी आजपासून मुंबईच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट?; ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर…
त्यांच्या या दौऱ्यात महाराष्ट्रातील राजकारणात नवे समीकरण जुळण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेला तृणमूल काँग्रेस हा नवा मित्रपक्ष मिळण्याची शक्यता आहे. आज रात्री तृणमूलच्या अध्यक्ष्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत शिवसेनेचे युवा नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतांची महत्त्वाची बैठक होणार आहे.
सध्या ममता बॅनर्जी या मुंबईत तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. ममता बॅनर्जी उद्या दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. मात्र त्याआधीच शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक होणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दक्षिण अफ्रिकेतून एवढे लोक मुंबईत आले; आदित्य ठाकरेंनी सांगितला खळबळजनक आकडा
महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. पक्षाची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील मित्रपक्ष बनवणे शिवसेनेला गरजेचे आहे. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासोबत होणाऱ्या या बैठकीत या मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जर ही भेट सकारात्मक झाली तर शिवसेनेला तृणमूलच्या माध्यमातून नवा मित्रपक्ष मिळू शकतो.
Read Also :
- पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
- “आ देखें ज़रा किसमें कितना है दम”; नवाब मलिक यांचे प्रवीण दरेकरांना आव्हान
- निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप
- संसदेतील बारा खासदारांच्या निलंबनावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘हा’ तर रडीचा डाव