मुंबई : महाराष्ट्रातील सर्व आमदार पोलिसांच्या सरंक्षणामध्ये गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी जो दावा केला आहे. तो बरोबर नाही. ज्या आमदारांना पोलिसांची सुरक्षा आहे, त्या पोलिसांना वरती कळवावं लागतं की आपला आमदार कुठे गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 25 ते 30 आमदार गुजरातमध्ये गेले याची कुणाला कल्पना नव्हती का? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोफ शिंदे गटात सामील; ४७ आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा
औरंगाबादमधील सर्व आमदार त्याचबरोबर दोन मंत्री देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे यावर आता संशय येतो की, हे सर्व शिवसेनेचाच डाव आहे. तसंचं हिंदुत्वाच्या मुद्दावर गेले असल्याचे सांगत आहेत मग अब्दूल सत्तार कट्टर हिंदुत्व झाले का ? असा सवाल उपस्थित करत बाकीच्या आमदार फक्त पैशाचसाठी गेले आहेत. असा आरोप देखी इम्तियाज जलील यांनी केला आहे.
जबरदस्तीने माझ्या अंगावर इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा आरोप
ज्या शहराला आठ दिवस पाणी मिळत नाही, त्या शहराचं नामांतर फक्त भावनिक मुद्दा घेऊन संभाजीनगर करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर राजकीय पक्षांतील नेत्यांनी शिवसेना खासकरून संजय राऊतांवर जोरदार टिका केली आहे. भाजप आणि मनसेतील काही नेत्यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे 11 ते 12 आमदार आता शिवसेनेसोबत राहतील अशी परिस्थिती आहे. पक्ष चालवणं उद्धव ठाकरे यांचं काम नाही. त्यामुळे त्यांनी आता आयपीएल साठी तयारी करावी मातोश्री 11 बनवा असं भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांचं स्वप्न पुर्ण.. शिवसेना संपली; मनसेचं सुचक वक्तव्य
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सेनेच्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे पहिल्यांदा सुरतला गेले आणि त्यानंतर ते आता आसामची राजधानी गुवाहाटी याठिकाणी आहेत. अपक्ष आमदारांसह एकुण 47 आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.
Read also:
- हिंदुत्वाच्या वनवासात ठाकरे अन् शिंदे राम लक्ष्मण जोडीसारखे, शिवसैनिकांनो रडायचे नाही
- सेना अन् शिंदे गटात टोकाचा संघर्ष; एकनाथ शिंदेंनी विधिमंडळाचा मुख्यप्रतोद नेताच बदलला
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा अखेरचा नमस्कार ? म्हणाले.. “अशीच साथ राहु द्या”
- “ठाकरेंनी आता ‘मातोश्री 11’ नाव देऊन IPL ची तयारी करावी”; निलेश राणेंचा शाब्दिक टोला
- बंडखोर आमदारांना शिवसेनेचा शेवटचा इशारा, सायंकाळी 5 पर्यंत मुंबईत या अन्यथा..;