अहमदनगर : अर्थसंकल्पीय अधिवेशानत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर विरोधी पक्षनेते आता राज्यात दौऱे करीत आहेत. शनिवारी ते शिर्डी याठिकाणी आले होते. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यावरून त्यावेळी देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
मोठी बातमी : 5 एप्रिलला राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता
राज्यातील अनेक घटनांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, राजकारण गेलं चुलीत, मात्र इथलं गव्हर्नन्स ठिक राहलं पाहिजे, परंतु त्यालाही बट्टा लागतोय, अशी अवस्था सध्या महाराष्ट्राची झाली आहे. महाराष्ट्राची अशी अवस्था आपण या आधी कधीही पाहिली नव्हती. अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
बच्चू कडूंच्या आईच्या तेरविच्या कार्यक्रमात पोलिसानी गायले भजन; प्रचंड व्हायरल
राज्यात जे काही सुरू आहे. त्यासंबंधी सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता मला राजकारणारपेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता आहे. राज्यात नो गव्हर्नन्स अशीच अवस्था पहायला मिळत आहे. अशी अवस्था राज्यानं कधीही पाहिली नव्हती. राजकारण जाईल चुलीत. महाराष्ट्र ठिक राहिला पाहिजे. येथील गव्हर्नन्स ठीक राहिला पाहिजे. महाराष्ट्राचा जो नावलौकीक आहे त्याला कुठेही बट्टा लागता कामा नये याची काळजी करण्याची गरज आहे असंही फडणवीस म्हणालेत.
” एसटी कर्मचाऱ्यांना आता ३१ मार्चचा शेवटचा अन् अंतिम अल्टिमेटम “; परिवहनमंत्री अनिल परब
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी विरूद्ध भाजप संघर्ष पेटला आहे. सत्ताधारी नेत्यांवर भाजप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तर भाजपवर देखील सत्ताधारी पक्षाचे नेते निशाणा साधत आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलाचं तापलेलं दिसून आलं आहे.
Read also:
- अजित पवारांची ‘ती’ खंत योग्यच; गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया
- उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय कधीतरी भरून निघेल; खडसेंचा फडणवीसांवर रोष
- सोमय्यांचा महाविकास आघाडीवर हातोडा; अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीत
- जुन्नर बिबट सफारी प्रकल्प वाद : अजित पवारांनी पुन्हा ठणकावलं
- ” अडाणी आमदार संतोष बांगरला घोडा लावणार “; वचिंतने दिला संतप्त इशारा