पुणे : गेल्या काही दिवसांपासून जुन्नर येथील बिबट्या सफारी प्रकल्पावरून राजकीय नेत्यांमध्ये जोरदार घमासम सुरू आहे. जुन्नर चा बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला पळवणार असल्याची टीका होत आहे. यावरून शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली होती. आता याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“ठाकरेंकडे शक्तिशाली टोमणा बॉम्ब”; फडणवीसांनी उडवली मुख्यमंत्री ठाकरेंची खिल्ली
जुन्नरची बिबट्या सफारी बारामतीला हलवलं हे धांदात खोटं आहे. बारामतीचा प्रकल्प 2016 सालीच मंजूर झाला होता. तर जुन्नरचा प्रकल्प वेगळा आहे. परंतु काहीजण यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नाव न घेता अजित पवारांनी केली आहे. बिबट्या सफरी प्रकल्पाचा मुद्धा विधानसभेत देखील गाजला होता.
पुण्यासाठी नवा विमानतळ द्यावा; वंदना चव्हाणांची राज्यसभेत मागणी
अजित पवार म्हणाले की, राज्याचा पर्यावरण विभाग हा आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. वन विभागाकडून जुन्नरमध्ये सर्वे करून बिबट सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरू केलं आहे. वनविभागाचे जुन्नरमध्ये बिबट्या सफारीसाठी कुठला स्पॉट चांगला आहे, याची पाहणीसाठी गेले आहेत. ते अधिकारी पुढील आठवड्याबाबत त्याबाबत निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले.तसेच अतुल बेनके आणि अमोल कोल्हे हे त्याठिकाणीचे प्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचंही ते म्हणालेत.
मुख्यमंत्री काश्मीर, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत; फडणवीसांचा टोला
दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटिल यांनी या प्रकल्पावरून जोरदार टिका केली होती. शिवसृष्टी बारामतीला पळवता. या पुणे जिल्हात सगळीकडे तुम्हीच आहे का ? तुम्ही जुन्नर तालुक्यातील धरणाचे पाणी कर्जतला पळविता तसेच नियोजित बिबट सफारी बारामतीला नेत आहेत. मात्र माझा जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला आता पळवुन नेऊ नका ? अशीही त्यांनी टिका केली होती.
Read also:
- ” अडाणी आमदार संतोष बांगरला घोडा लावणार “; वचिंतने दिला संतप्त इशारा
- मोठी बातमी : 5 एप्रिलला राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता
- बच्चू कडूंच्या आईच्या तेरविच्या कार्यक्रमात पोलिसानी गायले भजन; प्रचंड व्हायरल
- ” एसटी कर्मचाऱ्यांना आता ३१ मार्चचा शेवटचा अन् अंतिम अल्टिमेटम “; परिवहनमंत्री अनिल परब
- सतेज पाटीलांसह त्यांच्या कुटुंबिंयाबाबत ईडीकडे तक्रार करणार; कोल्हापूर उत्तरेत राजकारण तापलं