मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विरोधी पक्षांवर जबरदस्त टोलेबाजी करत टीका केली. रावणाचा जीव बेंबीत होता. तसा काहींचा जीव मुंबईत अडकला असल्याचा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला. आता याचाच धागा पकडत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री काश्मीरला गेले, दिल्लीला गेले परंतु भ्रष्टाचारवर काही बोललं नसल्याचा त्यांनी चिमटा काढला.
कंगना रणावत अन् गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई; इडीच्या कारवाईनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीला विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्तर व्यवस्थित देता आली नाही. यावेळी या अधिवेशनात मोठे असे काहीच निर्णय घेता आले नाहीत. महाराष्ट्र सरकारनं कर देखील कमी केले नाहीत. पेट्रोल डिझेलबाबात शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि किती दुटप्पी आहेत ते सगळं आम्हाला माहिती आहे. असंही ते म्हणालेत.
राणे कुटुंबियांवर कारवाई न केल्यास आत्महत्या करू; दिशा सलियनच्या आईचे राष्ट्रपतींना पत्र
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री काश्मीरला गेले, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत. काय लाचारी आली आहे शिवसेनेवर जे उद्धव ठाकरे नवाब मलिक यांचं समर्थन करतात. महाविकास आघाडी सरकार यामुळे या अधिवेशनामुळं हे सरकार उघड पडलं आहे. अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“वडिलांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला”; सदाभाऊ खोतांनी मानले फडणवीसांचे आभार ;
दरम्यान, कोरोना काळात केंद्र सरकारने राज्य सरकारला फार मदत केली. कोरोनाशी लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना पक्षीय भेद न करता मदत केली. मात्र केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर घेतले गेले परंतु ते चालले नाहीत. केंद्रीय सचिवांचा गट तयार केला गेला. त्यात केंद्रांन काही काळ पीपीई किट दिलं. धारावा वाचवली हे केवढं मोठं काम झालं, केंद्राचं पथक याठिकाणी येत होते. धारावीला वाचवायला सांगायचे त्याचबरोबर महापालिका कर्मचारी आणि आयुक्तांनी उत्तम काम केलं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.
Read also:
- उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगीराज’ सुरू; 50 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- एखादा पेताड असला तर तो रात्री पेंगतच येणार; अजित पवारांच्या फडकेबाजीवर हशा पिकला
- रावणाचा जीव बेंबी, तसा काहींचा जीव मुंबईत अडकला; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
- “आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं.. असं करायचं नाही” मुख्यमंत्र्यांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला
- ठाकरे, फडणवीस, पवारांच्या तोफा धडाडणार ; कोल्हापूर उत्तरेत रंगणार राजकीय कुस्तीचा फड