नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी राज सुरू झालं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह इतर 50 मंत्र्यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून योगींच्या शपथविधीची तयारी सुरू होती.
राणे कुटुंबियांवर कारवाई न केल्यास आत्महत्या करू; दिशा सलियनच्या आईचे राष्ट्रपतींना पत्र
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात सुर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी राणी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, नंद गोपाल गुप्ता, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्यय, आशिष पटेल, संजय निषाद यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
“वडिलांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला”; सदाभाऊ खोतांनी मानले फडणवीसांचे आभार ;
तसेच नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रविंद्र जयस्वाल, संदिप सिंह, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धर्मवीर प्रजापती, असीम अरूण, जेपीएस रोठौर, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरूण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालू यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
प्रताप सरनाईक यांना इडीचा दणका; कारवाई करत 11.36 कोटींची संपत्ती जप्त
दरम्यान, योगींच्या मंत्रिमंडळात मयंकेश्वर सिंह, दिनेश खटिक, संजीव गौड, बलदेव सिंह ओलख, अजित पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान, प्रतिभा शुक्ला, राकेश राठौड, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आजाद अंसारी, विजय लक्ष्मी गौतम यांना राज्यमंत्रिपदी संधी देण्यात आली आहे.
Read also:
- एखादा पेताड असला तर तो रात्री पेंगतच येणार; अजित पवारांच्या फडकेबाजीवर हशा पिकला
- रावणाचा जीव बेंबी, तसा काहींचा जीव मुंबईत अडकला; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
- “आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं.. असं करायचं नाही” मुख्यमंत्र्यांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला
- ठाकरे, फडणवीस, पवारांच्या तोफा धडाडणार ; कोल्हापूर उत्तरेत रंगणार राजकीय कुस्तीचा फड
- कंगना रणावत अन् गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई; इडीच्या कारवाईनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया