मुंबई : गेल्या काही दिसवापांसून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी ईडीने छापे टाकले. अशातच आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीन दुसऱ्यांदा छापा टाकला आहे. त्यामुळेे राज्यात आता राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.
कोणीही ऐरे गैऱ्यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला
आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास 11.36 कोटींची संपत्ती जप्त केल्याची माहिती मिळत आहे. ही सगळी संपत्ती ही ठाण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर इडीची कारवाई सुरू आहे.
“महाविनाश, महावसुली अन् मद्यविक्री” ; सरकारविरोधात फडणवीसांनी आरोपांची गरळ ओकली
याआधी टिटवाळा गुरूवल्ली येथील त्यांची 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली होती. त्यावेळी 13 हजार गुतंवणुकदारांचे 560 कोटी रूपय सरनाईक यांनी गायब केल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केले होते. ह्या जमीनीच्या घोटाळ्याची नोटीस 2014 सालीच इडीने काढली होती. आता ही जमीन जप्त करण्याची कारवाई ईडीने केली असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर सध्या इडीने कारवाई केली आहे. नवाब मलिक, य़शंवत जाधव, उपमुख्यमंत्री अजित पवार, भावना गवळी, अशा अनेक प्रमुख्य नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाचा वचक आहे. त्यामुळे आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार त्याकडे लक्ष लागून आहे.
Read also:
- स्वाभिमान पक्षाचे एकमेव आमदाराची पक्षातून हाकलपट्टी; कार्यकर्त्यांचा ढोल वाजवत आनंद साजरा
- टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची; राऊतांच्या वक्तव्याला राणांची मिश्कील टिप्पणी
- पेनड्राईव्हची फॅक्टरी यांनी काढली आहे का? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत वाढली; निवडणुकीसाठी तब्ब्ल २७ अर्ज दाखल
- “माझ्या शरीरात इंक टाकून हत्येचा कट रचला”; विधानसभेत नितेश राणेंचे सरकारवर धक्कादायक आरोप