कोल्हापूर : उत्तरेचे विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम हे मैदानात उतरले आहेत तर पालकमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आमदार महेश लांडगे यांचं वीज समस्याबाबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
कोल्हापूर उत्तर विधानसभेत राजकीय घडामोडींना ऊत आलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे. दोन्ही बाजुंनी नेते मंडळी एकमेकांवर टीकांच्या तोफा सोडत आहेत. वैयक्तिक टीकाही यामध्ये केली जात आहे हे देखील समोर आलं आहे.
ईमानदारी और सच्चाई का डर होना जरूरी है; जितेंद्र आव्हाडांना चंद्रकांत पाटलांचा टोला
शिवसेना सुरुवातीला नाराज होती असं वाटत होतं मात्र पक्ष प्रमुखांनी कोल्हापूरमधील नेत्यांना थेट मुंबईत बोलावून कानपिचक्या दिल्याने शिवसेनेचे नेते हे जयश्री जाधव यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे दोन प्रमुख पक्षांमध्ये लढाई होईल असं वाटत असताना गुरुवारी तब्ब्ल चौदा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता मत विभाजनाचा फटका दोन्ही प्रमुख पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
” वडिलांच्या हत्यानंतर संघर्ष केला अन् नीच प्रवृत्तीला हरवलं “; निबाळकरांचं बीडमध्ये ज्वलंत भाषण
आतापर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री चंद्रकांत जाधव ( इंडियन नॅशनल काँग्रेस), सचिन प्रल्हाद चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष), करुणा धनजंय मुंडे (अपक्ष), संजय भिकाजी मागाडे (अपक्ष), अरविंद भिवा माने (अपक्ष), भारत संभाजी भोसले (अपक्ष), शाहीद शहाजान शेख (अपक्ष), सत्यजित (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी), मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष), सुभाष वैजु देसाई (अपक्ष), आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष), मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष) व राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष), शेतकरी संघटनेचे राजेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
Read also:
- “माझ्या शरीरात इंक टाकून हत्येचा कट रचला”; विधानसभेत नितेश राणेंचे सरकारवर धक्कादायक आरोप
- कोणीही ऐरे गैऱ्यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला
- “महाविनाश, महावसुली अन् मद्यविक्री” ; सरकारविरोधात फडणवीसांनी आरोपांची गरळ ओकली
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ते पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात
- “मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, त्यात ३०० आमदारांना घरं बांधणार”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे