मुंबई : मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रीमंडळातील मंत्र्याएवढा कुणी केला नव्हता. त्याचा उल्लेख थेट सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून केला गेला. राज्यात काही योजना करायच्या आहेत परंतु आपल्या हातात नाही. तसेच महाविकास आघाडी फक्त घोषणा देत नाही तर काम करून दाखवत आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो असं वक्तव्य आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलं.
कितीही हल्ला करा, आमचा महाविकास आघाडीचा मजबुत किल्ला; रोहित पवारांचा भाजपला टोला
मुंबईत धारावी पुर्नविकास करण्याचं मनात आहे. धारावीचा विकास व्हायला पाहिजे. त्यासाठी आमचं केंद्र सरकारशी बोलणं सुरू आहे. तसेच रेल्वेच्या जागा हस्तांतरीत होत नाही. त्यासंदर्भात देखील बोलणं सुरू आहे. त्याचबरोबर राज्यातील आमदारांना मुंबईत ३०० घरं बांधणार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
राजकीय हेतूने कुणाला तरी त्रास देण्याचा कार्यक्रम ईडीने हाती घेतलाय :शरद पवार
आजारपणामुळे उद्धव ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात जास्त काळ हजर राहिले नसल्याने यावेळी विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना टोला हाणला. देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की मुबंईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. याठिकाणी जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा ४५ वर गेला आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, आणि नागपुर देखील आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेच लुटून नेण्याचं काम सूरू आहे. मुख्यमंत्र्ययाचं भाषण छोटं होतं पण छान होतं. असा मिश्कील टिप्पणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ऐरे गैरे नथ्थू खैरे, बीडचा सातबारा यांचा आहे का? जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीला संतप्त सवाल
तेे पुढे म्हणाले की, सफाई कामगाराच्या नावार आपल्या तिजोऱ्या कशा भरल्या हे अमित साटम तुम्हाला व्यवस्थित सांगतील , जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. युएनने कौतुक केलं, न्यायालयाने कौतुक केलं. परंतु हा भ्रष्टाचार त्यांच्यासमोर जायाला हवं होतं असंही ते म्हणालेत.
Read also:
- आमदार महेश लांडगे यांचं वीज समस्याबाबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
- ईमानदारी और सच्चाई का डर होना जरूरी है; जितेंद्र आव्हाडांना चंद्रकांत पाटलांचा टोला
- ” वडिलांच्या हत्यानंतर संघर्ष केला अन् नीच प्रवृत्तीला हरवलं “; निबाळकरांचं बीडमध्ये ज्वलंत भाषण
- “कुणी कुणाचे लाड अन् कुणी प्रसाद दिला, सांगता येणार नाही “; अजित पवारांची फटकेबाजी
- योगीच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षांसह अंबानी, अदानी उपस्थित राहण्याची शक्यता