बीड : अलिकडेच महाराष्ट्रात शिवसेनेने महाराष्ट्रात जनसंपर्क वाढविण्यासाठी शिवसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे सर्व आजी खासदार, आमदार हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेकडून मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याच संपर्क अभियानात शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ज्वलंत भाषण करून बीडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटवून दिला आहे.
यावेळी शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी त्यांनी उस्मानाबादमधील त्यांच्या काही वैयक्तिक आठवणी सांगितल्या. वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या कशी झाली आणि त्यानंतर आपण नेटाने, जिद्दीने कसे लढलो हे ओमराजे यांनी उपस्थितांना सांगितले. शून्य असं काही असतं हा न्यूनगंड डोक्यातून काढून टाका असं आव्हानही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढत; भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन कोणाच्या पथ्यावर?
त्यांनी सांगितलं की २००४ साली पवनराजे एक नीच राजकीय प्रवृत्तीच्या विरोधात अपक्ष उभे राहिले आणि अवघ्या ४०० मतांनी त्यांचा पराभव झाला. विरोधकच नको म्हणून पवनराजेंची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मी कमालीचा खचून गेलो होतो, आणि सर्वच जवळच्या लोकांनी राजकारण सोडून देण्याचा मला सल्ला दिला. तरीही मी मनाशी ठरवलं की तू एक पवनराजे जरी गोळ्या घालून संपवला असेल, तरी दुसरा पवनराजे तितक्याच ताकतीचा तुझ्या पुढे उभा करेल`हे मी लोकांना दाखवून देणार आणि तिथून सुरु झालं माझ्या आयुष्याचं खरं युद्ध. भविष्यात पवनराजेंच्या पोटी जन्म घेतला, हे सांगायची सुद्धा लाज वाटेल याची जाणीव मला होती.
धनंजय मुंडेंनी स्वत:ची सहा मुले तसेच अनेक बायकाही लपवल्या; करूणा मुंडेंचा गंभीर आरोप
सर्वस्व संपलेलं असताना मी या राजकीय रणांगणात उतरलो आणि सर्वच गोष्टी विरोधात असताना ग्रामपंचायतीपासून तर थेट खासदारकीपर्यंत लढाई लढलो आणि लोकांनी भरभरून मतदान करत आंम्हाला निवडून दिलं. विरोधक कितीही मोठा असू द्या, तुम्ही ठाम राहा, जिद्दीने लढा यश तुम्हाला मिळतेच असेही ओमराजे यांनी सांगितले.
Read also:
- “कुणी कुणाचे लाड अन् कुणी प्रसाद दिला, सांगता येणार नाही “; अजित पवारांची फटकेबाजी
- योगीच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षांसह अंबानी, अदानी उपस्थित राहण्याची शक्यता
- कितीही हल्ला करा, आमचा महाविकास आघाडीचा मजबुत किल्ला; रोहित पवारांचा भाजपला टोला
- राजकीय हेतूने कुणाला तरी त्रास देण्याचा कार्यक्रम ईडीने हाती घेतलाय :शरद पवार
- ऐरे गैरे नथ्थू खैरे, बीडचा सातबारा यांचा आहे का? जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीला संतप्त सवाल