मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मुलीबद्दल एक विधान केलं आहे. त्याची चर्चा संपुर्ण राज्यात रंगली होती. तसेच त्यांच्या विधानांवर राज्यातील अनेक नेत्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणे म्हणजे श्रीधर पाटणकर यांच्यावर देखील ईडीने कारवाई केली आहे. याचाच धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे.
ऐरे गैरे नथ्थू खैरे, बीडचा सातबारा यांचा आहे का? जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीला संतप्त सवाल
जितेंद्र आव्हाड यांनी आपली मुलगी महाराष्ट्रात सुरक्षित नसून तीला चौकशीसाठी बोलवलं तरी ती आत्महत्या करेल, अशा पद्धतीचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केला होतं. यावर जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा उल्लेख न करता चंद्रकांत पाटलांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने काही जण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागले आहेत. ईमानदारी और सच्चाई का ये डर अच्छा है, ये डर होना जरूरी है. असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या मुलीबद्दल वक्तव्य केलं. ते असं म्हणाले की, माणसाला भीती खात असते. रात्री 3 वाजता टकटक झालं, तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता जास्त असते. कुणाच्या घरात कोण घुसेल हे ध्यानी मनी स्वप्नीचं नसतं. यात ज्यांचा तुमच्या राजकारणांशी संबंध नसतो, अशा माणसांचे हाल होतात. माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय ? परंतु तिला जर उद्या नुसतं बोलवलं, तरी ती आत्महत्या करेल, असं खळबळजनक वक्तव्य जितेंद्र आव्हांडानी केलं आहे.
कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढत; भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन कोणाच्या पथ्यावर?
दरम्यान, राज्यातील तसेच देशातील वातावरण इतकं गढूळ झालं आहे की, मला तर वाटतं माझ्या मुलीने याठिकाणी राहु नये. मी जेव्हा कोरोनाची भयानक परिस्थिती बघितली. ती इतकी भितीदायक वाटत होती. परंतु आता जर काही माझ्याबाबतीत घडणार नाही याची मला 100 टक्के खात्री आहे, परंतु उद्या मला काही झालंच तर मनात विचार येतो की माझ्या पोरीचं भविष्यात काय होईल. असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
Read also:
- ” वडिलांच्या हत्यानंतर संघर्ष केला अन् नीच प्रवृत्तीला हरवलं “; निबाळकरांचं बीडमध्ये ज्वलंत भाषण
- “कुणी कुणाचे लाड अन् कुणी प्रसाद दिला, सांगता येणार नाही “; अजित पवारांची फटकेबाजी
- योगीच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षांसह अंबानी, अदानी उपस्थित राहण्याची शक्यता
- कितीही हल्ला करा, आमचा महाविकास आघाडीचा मजबुत किल्ला; रोहित पवारांचा भाजपला टोला
- राजकीय हेतूने कुणाला तरी त्रास देण्याचा कार्यक्रम ईडीने हाती घेतलाय :शरद पवार