मुंबई : राज्य सरकारने दुकानांमध्ये दारू विक्रीचा निर्णय घेतला. त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. याचे पडसाद आज विधानसभेत देखील बघायला मिळालेत. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील यावर टिप्पणी केली. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टोलेबाजींवर सभागृहात एकच हशा पिकला.
“वडिलांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला”; सदाभाऊ खोतांनी मानले फडणवीसांचे आभार ;
दारू घ्यायचीच असेल तर घेणारा कुठुनही शोधून काढतो. गेल्या अनेक वर्षात मी हे अनुभवलंय. एखादा पेताड असला, तरी तो कुठल्याही गावात असू द्या. आपल्याला त्या गावातली दारूचू दुकानं माहिती नसतात, असं होत नाही. तरी ते पेंगतच रात्री गावात येतात. त्याला विचारलं कसं रे. तर म्हणतो आलो जाऊन. त्याला ती दारू कशी मिळते त्यांच त्यालाच माहिती असते. पिणारा माणुस अजिबात चुकत नाही. असं अजित पवारांनी म्हटल्यावर सभागृहातील सगळे जण हसायला लागले.
प्रताप सरनाईक यांना इडीचा दणका; कारवाई करत 11.36 कोटींची संपत्ती जप्त
तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात ४०० ते ५०० मॉलमध्येच दारू विक्री केली जाईल. ज्यांची संमती नसेल ,तिथे दारू विक्री केली जाणार नाही. त्याशिवाय अजूनही आम्ही ते केललं नाही. जनतेला जर ते नको असेल, तर आमची आग्रहाची भूमिका अजिबात नाही. नागरिकांना नको त्या सवयी लागाव्यात, वेगळा समाज निर्माण व्हावा अशी भावना कुणाचीही नसते असंही त्यांनी म्हटलंय.
स्वाभिमान पक्षाचे एकमेव आमदाराची पक्षातून हाकलपट्टी; कार्यकर्त्यांचा ढोल वाजवत आनंद साजरा
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारचा अर्थ महाविनाश, महामद् विक्री आणि महावसूली असं म्हटलं होतं. त्यावरून देखील त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं.
Read also:
- रावणाचा जीव बेंबी, तसा काहींचा जीव मुंबईत अडकला; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
- “आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं.. असं करायचं नाही” मुख्यमंत्र्यांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला
- ठाकरे, फडणवीस, पवारांच्या तोफा धडाडणार ; कोल्हापूर उत्तरेत रंगणार राजकीय कुस्तीचा फड
- कंगना रणावत अन् गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई; इडीच्या कारवाईनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया
- राणे कुटुंबियांवर कारवाई न केल्यास आत्महत्या करू; दिशा सलियनच्या आईचे राष्ट्रपतींना पत्र