मुंबई : कोरोना काळात केंद्र सरकारने राज्य सरकारला फार मदत केली. कोरोनाशी लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना पक्षीय भेद न करता मदत केली. मात्र केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर घेतले गेले परंतु ते चालले नाहीत. केंद्रीय सचिवांचा गट तयार केला गेला. त्यात केंद्रांन काही काळ पीपीई किट दिलं. धारावा वाचवली हे केवढं मोठं काम झालं, केंद्राचं पथक याठिकाणी येत होते. धारावीला वाचवायला सांगायचे त्याचबरोबर महापालिका कर्मचारी आणि आयुक्तांनी उत्तम काम केलं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.
स्वाभिमान पक्षाचे एकमेव आमदाराची पक्षातून हाकलपट्टी; कार्यकर्त्यांचा ढोल वाजवत आनंद साजरा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दहिसर येथील प्रकल्पावरुन चिमटा काढत उद्धव ठाकरे म्हणाले की, केरळचं उत्तर तामिळनाडूला असं होईल, त्या जागेवर रूग्णालय व्हावं ही तुमच्यासारखीच आमची देखील इच्छा आहे. ते प्रकरण कोर्टोत असून महापालिकेचा त्यावर आक्षेप आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई मॉडेलचं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयनं कौतुक केलं. त्यासाठी आम्ही जम्बो कोविड सेंटर सुरू केलं. नरेंद्र मोदी यांनी धोक्याची घंटा लक्षात आणून दिली. त्यामुळे देशात दुसऱ्या कोणी जम्बो कोविड सेंटर उभारली नसती तर काही ठिकाणी नदीत मृतदेह सापडले असते अशी स्थिती झाली असती. असंही ते म्हणालेत.
टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची; राऊतांच्या वक्तव्याला राणांची मिश्कील टिप्पणी
सुधीर भाऊ छापैकी बोलता त्याचं उत्तर द्यावं लागतं. महाराष्ट्राला मद्यराष्ट म्हणालात. आपण चंद्रपूरमधून आलात विदर्भात मुद्दे मांडणार. बाजूला मध्यप्रदेश आहे. त्यांचे आकडे वाचणार आहे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं असं करायचं नाही. एक लाख लोकसंख्यामागे मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात कमी आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि तामिळनाडूची आकडेवारी देखील वाचून दाखवली.
पेनड्राईव्हची फॅक्टरी यांनी काढली आहे का? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
दरम्यान, टीका करा पंरतु त्या टीकेला आपण योग्य जात आहोत की नाही ते देखील पहावं, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल देखील विधानसभेत दमदार भाषण केलं होतं. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे यावर राजकीय नेते काय उत्तर देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- ठाकरे, फडणवीस, पवारांच्या तोफा धडाडणार ; कोल्हापूर उत्तरेत रंगणार राजकीय कुस्तीचा फड
- कंगना रणावत अन् गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई; इडीच्या कारवाईनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया
- राणे कुटुंबियांवर कारवाई न केल्यास आत्महत्या करू; दिशा सलियनच्या आईचे राष्ट्रपतींना पत्र
- “वडिलांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला”; सदाभाऊ खोतांनी मानले फडणवीसांचे आभार ;
- प्रताप सरनाईक यांना इडीचा दणका; कारवाई करत 11.36 कोटींची संपत्ती जप्त