पुणे : गेल्या अनेक दिवसांपासुन पुणे येथील विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. याचसंदर्भात खासदार वंदना चव्हाण यांनी आज राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला. जीएसटी संकलनात आघाडीवर असलेल्या पुण्याला दिर्घकाळ नागरी विमानतळाच्या सुविधेपासून वंचित राहावं लागत असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्क करून दाखवली.
ठाकरे, फडणवीस, पवारांच्या तोफा धडाडणार ; कोल्हापूर उत्तरेत रंगणार राजकीय कुस्तीचा फड
पुणे हे महाराष्ट्रातील दुसरे तर देशातील नववे मोठे शहर असून गेल्या तीन दशकात पुणे शहराने मोठ्या प्रमाणावर भरारी घेतली आहे. आयटी, औद्योगिक व अभियांत्रिकी क्षेत्रात आपले वेगळं स्थान पुणे शहराने निर्माण केलं आहे. राज्याच्या जीएसटीमध्ये पुण्याचा वाटा हा 2.92 लाख कोटी इतका आहे. तसेच 800 महाविद्यालये असून ज्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे पुण्यासाठी लवकरात लवकर स्वतंत्र नागरी विमानतळाचा प्रस्ताव मान्य करण्यात यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
कंगना रणावत अन् गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई; इडीच्या कारवाईनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, सद्यस्थितीला पुण्यातील हवाई वाहतूक ही लोहगाव येथील इंडियन एअरफोर्स स्टेशन येथूनच आहे. ज्याची क्षमता प्रतिवर्ष 15 लाख प्रवासी इतकीच होत आहे. त्यामुळे पुण्याला एका नवीन ग्रीन फिल्ड विमानतळाची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी या विषयासाठी संरक्षण मंत्रालय व नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाशी सातत्याने संपर्कात आहेत. मात्र असं असूनही त्यांनी हा प्रकल्प अजूनही प्रलंबित ठेवल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
राणे कुटुंबियांवर कारवाई न केल्यास आत्महत्या करू; दिशा सलियनच्या आईचे राष्ट्रपतींना पत्र
दरम्यान, राज्यात पुण्यातील नागरी विमानतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरूवातीला चाकण परिसराची पाहणी करण्यात आली होती. परंतु या जागेवर विमानतळाला स्थानिक लोकांनी तसेच नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यासाठी आंदोलने देखील झालीत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात पुरंदर तालुक्यात विमानतळाची जागा निश्चित करण्यात आली होती. आता नव्याने ही जागा बदलण्याची तयारी सुरू असून त्यावर राजकारण सुरू आहे.
Read also:
- मुख्यमंत्री काश्मीर, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत; फडणवीसांचा टोला
- उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगीराज’ सुरू; 50 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- एखादा पेताड असला तर तो रात्री पेंगतच येणार; अजित पवारांच्या फडकेबाजीवर हशा पिकला
- रावणाचा जीव बेंबी, तसा काहींचा जीव मुंबईत अडकला; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
- “आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं.. असं करायचं नाही” मुख्यमंत्र्यांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला