मुंबई : विधिमंडळ अधिवेशनात काल सत्ताधारी आणि विरोधक अशी दोन्ही बाजुंनी कमालीची जुगलबंदी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सयंमाचा बांध तोडून टाकत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसहित भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ईडीच्या वारंवार होणाऱ्या कारवाया, निकटवर्तीयांना होणार केंद्रीय यंत्रणांचा त्रास, छापेमाऱ्या, तेच ते भ्रष्टाचाराचे आरोप यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात आपले मत मांडले.
“आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं.. असं करायचं नाही” मुख्यमंत्र्यांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला
आमच्या नातेवाईकांना त्रास देत आहात, आमच्या मुला-बाळांवर भ्र्रष्टचाराचे आरोप करतात, वारंवार धमक्या देतात आणि चिखलफेक करतात. हे अत्यंत चुकीचे आहे आणि जर तुमच्यात खरचं दम असेल तर तुम्ही थेट आता माझ्यावर कारवाई करा. मलाच अटक करून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाला आणि केंद्रीय यंत्रणांना केलं आहे.
ठाकरे, फडणवीस, पवारांच्या तोफा धडाडणार ; कोल्हापूर उत्तरेत रंगणार राजकीय कुस्तीचा फड
उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण झाल्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलं आणि त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची अक्षरशः खिल्ली उडवली. मुख्यमंत्र्यांना आम्ही ज्या काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती त्या एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. युक्रेनने आता नाटो ऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदत मागावी आणि ते मदत देतील असं वक्तव्य करून ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.
कंगना रणावत अन् गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई; इडीच्या कारवाईनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया
आम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला असताना सरकारने कुठलेही उत्तर दिले नाही. महाविकास आघाडी सरकारचा कत्तलखाना आम्ही तीन पेनड्रइव्हच्या माध्यमातून समोर आणला आहे. आता त्यावर तुम्ही काही कारवाई करत नसल्याने आम्ही कोर्टात याबाबत याचिका केली आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे असं देखील फडणवीसांनी सांगितलं आहे. विदर्भ आणि मराठावाडा सबसिडीचे पैसे मागत होतो. मात्र, यांनी काहीच उत्तर दिले नाही. तसेच, पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करणारे कॉंग्रेस हे दुटप्पी आहे असा टोलाही फडणवीसांनी काँग्रेसला हाणला आहे.
Read also:
- पुण्यासाठी नवा विमानतळ द्यावा; वंदना चव्हाणांची राज्यसभेत मागणी
- मुख्यमंत्री काश्मीर, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत; फडणवीसांचा टोला
- उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगीराज’ सुरू; 50 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- एखादा पेताड असला तर तो रात्री पेंगतच येणार; अजित पवारांच्या फडकेबाजीवर हशा पिकला
- रावणाचा जीव बेंबी, तसा काहींचा जीव मुंबईत अडकला; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर