कोल्हापूर : उत्तरेचे विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपकडून सत्यजित कदम हे मैदानात उतरले आहेत तर पालकमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतरही काही पक्षांनी कोल्हापूर उत्तरेत आता आपली ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे.
रावणाचा जीव बेंबी, तसा काहींचा जीव मुंबईत अडकला; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
प्रचाराच्या सुरुवातीपासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचे चित्र समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीलाच पालकमंत्री बंटी पाटील यांच्यावर तोफ डागत या लढाईला सुरुवात केली होती. दुसऱ्या बाजूनेही तितक्याच आक्रमकतने बंटी पाटील यांनीही वर केला होता. ५० वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षानं काय केलं आणि काय केलं नाही यासाठी तुम्ही बिंदू चौकात येणार का ? असं आव्हान बंटी पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं होतं. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनीही जोरदार बॅटिंग करत सिक्स मारण्याचा प्रयत्न केला होता.
“आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं.. असं करायचं नाही” मुख्यमंत्र्यांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला
हे सर्व सुरु असतानाच आता कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन बंटी पाटील यांना अडचणीत आण्यासाठी प्रयत्न केल्याचे चित्र समोर आले आहे. सुनील कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन बंटी पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ईडीकडे बंटी पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार करणार असल्याची माहिती सुनील कदम यांनी दिली आहे.
ठाकरे, फडणवीस, पवारांच्या तोफा धडाडणार ; कोल्हापूर उत्तरेत रंगणार राजकीय कुस्तीचा फड
काहीही झालं तरी सतेज पाटील यांना सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यात सध्या ईडीच्या जोरदार कारवाया सुरु असताना आता पोटनिवडणुकीतही ईडीचे नाव घेतल्याने आता रंगत आणखीच वाढली आहे असं बोललं जातं आहे. आता सतेज पाटील यावर आपली काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्नवाचे लक्ष लागून राहिले आहे.
Read also:
- “ठाकरेंकडे शक्तिशाली टोमणा बॉम्ब”; फडणवीसांनी उडवली मुख्यमंत्री ठाकरेंची खिल्ली
- पुण्यासाठी नवा विमानतळ द्यावा; वंदना चव्हाणांची राज्यसभेत मागणी
- मुख्यमंत्री काश्मीर, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत; फडणवीसांचा टोला
- उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगीराज’ सुरू; 50 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- एखादा पेताड असला तर तो रात्री पेंगतच येणार; अजित पवारांच्या फडकेबाजीवर हशा पिकला