पुणे : काल मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील उपस्थित होते. परंतु या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. लोकसभा मतदारसंघाच्या दोन ते तीन जागांवर तिढा कायम असून येत्या ११ मार्चला दिल्लीत पुन्हा महायुतीची बैठक होणार आहे. यातच आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाने उमेदवारी सांगितली आहे.
हेही वाचा..“मी महादेवाचा भक्त..तिसरा डोळा उघडेल तेंव्हा..,”कारखान्यावरील कारवाईनंतर रोहित पवारांचा कडक इशारा
आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात दोन जागा मिळाल्या पाहिजेत. शिर्डी या लोकसभा मतदारसंघात मी स्वत: निवडणुक लढणार आहे. भाजपने जर मला लोकसभेची जागा सोडली, तर मी कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, तर मी माझ्या रिपल्बिकन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढेल अशी ठाम भुमिका रिपल्बिकन पक्षाच्या नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.
हेही वाचा…“हरणाऱ्या नाही तर जिंकणाऱ्या जागा हव्यात”, वंचितचं घोंगड महाविकास आघाडीपुढे पुन्हा अडलं
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे मोठे नेते आहेत. जेव्हा महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होईल, तेव्हा त्यांचे नाव पहिल्या यादीत असेल, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना गडकरींची चिंता करण्याची गरज नाही, असा टोला लगावला.
READ ALSO :
हेही वाचा..भास्कर जाधव उद्या मोठा निर्णय घेणार ? उद्या कार्यकर्त्यांसोबत एकत्रित संवाद साधणार
हेही वाचा…कॉंग्रेसने लोकसभेसाठी जाहीर केले ३९ उमेदवार, राहुल गांधी यांच्यासह नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“चर्चा कोणतीही होवो, माझं तिकीट कन्फर्म,” संजय मंडलकींचा कोल्हापुरच्या जागेवर दावा
हेही वाचा“शिंदे अन् अजित पवार गटाचा राजकीय अंत निश्चित, भाजप ४८ जागांवर निवडणुक लढवेल”
हेही वाचा…आढळरावांची निवडणुकीतून माघार ? शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट