पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांचा बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना जप्त करण्यात आला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल ५० कोटी रूपयांचा कारखाना जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे याची सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा….‘त्या’ मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे ” आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी
शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. याच प्रकरणाबाबत रोहित पवारांची देखील इडीकडून चौकशी करण्यात आली होती. आज अखेर रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचा कन्नड कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. औरंगाबाद मध्ये असलेला कन्नड साखर कारखाना हा ५० कोटीचा कारखाना आहे. यासह १६४ एक जमीन असून साखर कारखान्याची साधनसंपत्ती देखील जप्त करण्यात आल्याचे म्हटले आहे. यावर आता रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड, कर्नाटकात भाजपला फायदा होणार का ?
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय. असेही रोहित पवारांनी सांगितलंय.
दरम्यान, ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही त्यांनी दिलाय.
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?😂
पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!
माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न…— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“हरणाऱ्या नाही तर जिंकणाऱ्या जागा हव्यात”, वंचितचं घोंगड महाविकास आघाडीपुढे पुन्हा अडलं
हेही वाचा…रोहित पवारांना सर्वात मोठा धक्का, बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना ईडीकडून जप्त
हेही वाचा…“गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच उमेदवारी भाजपने टाळली”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…“तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल”, राणेंनी कदमांना दिला इशारा
हेही वाचा.ही लढाई आता ‘वाघ विरूद्ध लांडगे’, अमित शाहांचा उल्लेख करत ठाकरेंनी भाजपला डिवचलं