धाराशीव : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव जिल्ह्याचं नामांतरण कोणी केले माहिती नाही. आम्ही ज्यावेळी तुमच्यासोबत सत्तेत होतो, तेव्हा का या जिल्ह्यांचं नामांतरण केलं नाही. परंतु ज्यांना घरामध्ये काय चाललंय माहिती नाही ते आम्हाला संपवायला निघाले आहेत. अस म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कळंब याठिकाणी ठाकरेंची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…डझनभर विद्यमान खासदाराला भाजप देणार नाराळ, नव्या उमेदवारांना संधी, राजकीय हालचाली वाढल्या
2019 साली माझ्या शिवसैनिकांची तुम्हाला मत हवी होती म्हणून तुम्ही मातोश्रीवर आला होता. त्यावेळी अहमदाबाद आणि वाराणसी मध्ये उमेदवारीचा अर्ज सादर करण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळी मला कशाला बोलावलं होतं ? असा सवाल करत ही सगळी संपत्ती माझी वडिलोपर्तित आहे. शाह तुमचा याठिकाणी अधिकार नाही. असं म्हणतही ठाकरेंनी शाहांना ठणकावलं.
हेही वाचा…“नितीन गडकरींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी,” भाजपने संजय राऊतांना चांगलचं सुनावलं
दरम्यान, पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, ही लढाई आता वाघ विरूध्ध लांडगे अशी झाली आहे. ही लढाई आता इमानदार विरूद्ध बेईमानदार आणि निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशी झाली आहे. तसेच जर शिवसेनेने भाजपला खांद्यावर घेतलं नसतं. तर आज चार खांदेसुद्धा मिळाले नसते. असा टोलाही ठाकरेंनी लगावला. त्याचबरोबर न्यायदानामध्येही भाजपची काळी मांजरी बसली असतील तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे ? असा सवालही त्यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा..‘त्या’ मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे ” आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड, कर्नाटकात भाजपला फायदा होणार का ?
हेही वाचा…गडकरींना तिसऱ्यांदा संधी, १० नव्या उमेदवारांना संधी, भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार
हेही वाचा…चिखलीकरांची चिंता वाढली, नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण समर्थकाला संधी ?