मुंबई : महायुतीत कोणत्या जागा कुणाला येणार ? याची चर्चा सुरू असतानाचा विद्यमान खासदारांमध्ये धाकधूक चांगलीच वाढलीय. कारण महायुतीतील तिन्ही पक्षांतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले असून ज्यात झडनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला नाही. त्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व्हे मध्ये ज्यांचा स्ट्राईक चांगला नाही. त्यांचा पत्ता कट करण्याची हालचाल्या सुरू झाल्या आहेत. यामध्ये बीड, धुळे, सोलापुर, सांगली, लातूर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नांदेड, अहमदनगर, धुळे, वर्धा, रावेर या मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता याठिकाणी नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार असून विद्यमान खासदारांमध्ये नाराजी तर नव्या उमेदवारांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
हेही वाचा…“तर नरेंद्र मोदी कचऱ्याच्या डब्यात पडले असते”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने धक्कातंत्राचा वापर केला होता. त्यावेळी अनेकांना डावलून भाजपने नवख्या उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं होतं. मात्र भाजपची ही रणनिती यशस्वी ठरली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपने याही निवडणुकीत २०१९ चीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नितीन गडकरींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी,” भाजपने संजय राऊतांना चांगलचं सुनावलं
हेही वाचा…यंदा कॉंग्रेस लोकसभेच्या ३०० जागा लढवणार, भाजपला देणार कडवं आव्हान
हेही वाचा…“भाजप EVM शिवाय ४०० पार होणार नाही म्हणून..,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
हेही वाचा..“भाजपला केवळ श्रीमंतांचाच पुळका”, वर्षा गायकवाडांनी भाजपवर हात धुवून घेतला
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…