नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३०० जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. एखादवेळी ३०० पेक्षा कमी जागा लढवू शकते. असे संकेत पक्षाच्या वॉर मधून मिळत आहे. पक्षाने भलेही २०१९ मध्ये ४२३ किंवा २०१४ मध्ये ४६४ जागा लढवल्या असतील. मात्र विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्साठी आवश्यक दहा टक्के जागाही पक्षाला मिळवता आल्या नव्हत्या. त्यामुळे पक्षनेते राहुल गांधी रणनिती बदलली असून अधिक जागा जिंकण्यासाठी अधिकाधिक पक्षांसोबत युती आणि त्यांना अधिक जागा सोडण्याचे धोरण आता अवलंबण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा…“शेपुट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला अन् आमच्यावर फणा काढून गेला”, ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
२०१९ मध्ये कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागांपैकी ६७ जागा लढवल्या होत्या, मात्र तिथे केवळ एकच जागा कॉंग्रेसच्या ताब्यात आली होती. यावेळी आता मित्र पक्षासोबत युती करून यावेळी फक्त १७ जागा लढविणार असल्याची घोषणा कॉंग्रेसने केली आहे. महाष्ट्रात कॉंग्रेसने २०१९ मध्ये २५ जागा लढवल्या होत्या. मात्र कॉंग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. यावेळी कॉंग्रेस कमी जागा लढणार असून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य कॉंग्रेसने ठेवले आहे.
हेही वाचा..“मुंबई पालिका भ्रष्टाचाराचे आगार, 700 कोटींच्या कंत्राटावर डल्ला”, विरोधकांचा हल्लाबोल
आंध्रप्रदेश व ओडिशा यासारख्या काही राज्यांत कॉंग्रेसची परिस्थिती ठिक नाही. तर मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड, या भाजपशी थेट मुकाबला असलेल्या राज्यांत तसेच ईशान्य आसाम वगळता अन्य राज्यांत तुल्यबळ लढा देण्यासाठी कॉंग्रेससमोर अडथळ्यांची शर्यत आहे. मात्र सत्तेत असलेल्या तेलंगणा आणि कर्नाटकात आपल्या खासदारांची संख्या वाढवण्याची पक्षाला गरज आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजप EVM शिवाय ४०० पार होणार नाही म्हणून..,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
हेही वाचा..“भाजपला केवळ श्रीमंतांचाच पुळका”, वर्षा गायकवाडांनी भाजपवर हात धुवून घेतला
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
हेही वाचा“तर नरेंद्र मोदी कचऱ्याच्या डब्यात पडले असते”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात