मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नावाचाही समावेश आहे. महाराष्ट्रात अद्यापही कोणत्याही भाजपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपच्या लोकासभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादित भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबईतील कृपाशंकर सिंहांचे नाव आहे. अनेक ऐरेगैरे यांची नावे भाजपच्या पहिल्या यादित आहेत. पण नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत डावलण्यात आल्याची टिका सामानातून करण्यात आली आहे. त्यावर आता भाजपकडून संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…“तर नरेंद्र मोदी कचऱ्याच्या डब्यात पडले असते”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
आज संजय राऊत यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. पण राऊत हे विसरले आहेत की, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठा मध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा ३३ वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो. आदरणीय नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी साहेबांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये. असं भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…“शेपुट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला अन् आमच्यावर फणा काढून गेला”, ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
दरम्यान, संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते. महाविकास आघाडीचे जागा वाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात. त्यांना धमकावतात. नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचे मन शांत होत नाही. म्हणून मग ते बैठकीत चहा देणाऱ्या वेटरवर खेकसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत. काल राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना ‘ हट्ट करू नका‘ असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे. असाही टोलाही लगावला.
संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते.
महाविकास आघाडीचे जागा वाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…यंदा कॉंग्रेस लोकसभेच्या ३०० जागा लढवणार, भाजपला देणार कडवं आव्हान
हेही वाचा…“भाजप EVM शिवाय ४०० पार होणार नाही म्हणून..,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
हेही वाचा..“भाजपला केवळ श्रीमंतांचाच पुळका”, वर्षा गायकवाडांनी भाजपवर हात धुवून घेतला
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…