मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या सर्व्हेत राज्यातील डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये नांदेडचे भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा देखील समावेश आहे. त्याला कारणही तितकचं मोठं आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चिखलीकरांसमोर धोक्याची घंटा आलीय. याची चर्चा राजकारणात सध्या सुरू झाली आहे.
हेही वाचा..“भाजपला केवळ श्रीमंतांचाच पुळका”, वर्षा गायकवाडांनी भाजपवर हात धुवून घेतला
नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचे नाव अचानक समोर आल्यानंतर पक्षातील अन्य इच्छुकांमध्ये अस्वस्थता परसली आहे. विशेष:त विद्यमान खासदार प्रतावराव चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का ? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. अलिकडेच अमित शाह यांची खतगावकर यांनी भेट घेतली होती. त्यामुळे चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशास पुढील आठवड्यात एक महिना पुर्ण होईल. या अल्पावधीत त्यांनी स्थानिक भाजपातील चित्र बदलून टाकले आहे. कॉंग्रेसमध्ये लोकसभेचा उमेदवार ठरविण्याची बाब त्यांच्या अधिकारकक्षेत होती. पण भाजपतही आता तसेच झाले असून त्यांच्या गटाने डॉ. मीनल पाटील यांचे नाव प्रथम पक्षाच्या निरीक्षकांसमोर ठेवले आहे. नंतर ते वरच्या पातळीवर पक्षाच्या उमेदवारीबाबत आतापर्यंत निश्चित असलेल्या चिखलीकर यांची चिंता वाढली आहे.
READ ALSO :
हेही वाचाडझनभर विद्यमान खासदाराला भाजप देणार नाराळ, नव्या उमेदवारांना संधी, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“नितीन गडकरींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी,” भाजपने संजय राऊतांना चांगलचं सुनावलं
हेही वाचा…यंदा कॉंग्रेस लोकसभेच्या ३०० जागा लढवणार, भाजपला देणार कडवं आव्हान
हेही वाचा…“भाजप EVM शिवाय ४०० पार होणार नाही म्हणून..,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान