मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईत ०६ मार्च रोजी फोर सिझन्स येथे जागावाटपाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. या बैठकीत जागावाटपाचा कोणताही तिढा सुटलेला नाही. कारण वंचितकडून आता महाविकास आघाडीला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटप अद्याप प्रलंबित असून कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात १० तर तीनही पक्षांत ५ जागांवरअशा एकूण ४८ पैकी १५ जागांवर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यानंतर आम्हाला बैठकीसाठी बोलावलं. असे वंचितकडून प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी महाविकास आघाडीला पत्र पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा…सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून निवड, कर्नाटकात भाजपला फायदा होणार का ?
भाजप- आरएसएसच्या नीच विभाजनकारी आणि लोकशाही विरोधी अजेंड्याविरूद्ध सातत्याने ठामपणे आणि बेधकडपणे उबा असलेला एकमेव आमचाच पक्ष आहे. आम्ही जागा वाटपाच्या बाबत आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टीकोणाबद्दल चिंतित असल्याचे सांगण्यात आलं तरसेच २ फेब्रवारी आणि २७ फेब्रुवारीच्या बैठकानंतर आम्हाला चर्चेतून वगळण्यात आले.
हेही वाचा…गडकरींना तिसऱ्यांदा संधी, १० नव्या उमेदवारांना संधी, भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार
यातच आम्हाला फक्त दोन जागा देऊ केल्या आहेत. तसेच मागील दोन ते तीन निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणीही या जागा जिंकलेल्या नाहीत. त्यामुळे फक्त जाणीवपुर्वक हरणाऱ्या जागा वंचितला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित आघाडीच्या लक्षणीय मतदारांचा पाठिंबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा असलेचे मत कार्यकर्त्यांचे आहे. आपली लक्षणीय मते हवीत पण जिंकू शकणाऱ्या जागा वंचित आघाडीला द्यायच्या नाहीत हे महाविकास आघाडीचे धोरण आहे हा ग्रह कार्यकर्त्यांचा होत आहे. त्यामुळे आम्हाला जिंकणाऱ्या जागा हव्या आहेत. अशी मागणीही त्यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पवारांना सर्वात मोठा धक्का, बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना ईडीकडून जप्त
हेही वाचा…“गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच उमेदवारी भाजपने टाळली”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…“तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल”, राणेंनी कदमांना दिला इशारा
हेही वाचा.ही लढाई आता ‘वाघ विरूद्ध लांडगे’, अमित शाहांचा उल्लेख करत ठाकरेंनी भाजपला डिवचलं
हेही वाचा..‘त्या’ मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे ” आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी