चिपळूण : कोकणात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात चांगलाच संघर्ष बघायला मिळत आहे. राणे कुटुंबीय भास्कर जाधव यांच्यावर वारंवार टिका करतांना दिसत आहेत. तर भास्कर जाधव यांच्याकडून राणे कुटुंबीयाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच एका राजकीय व्यासपीठावरून जाधवांना जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आलीय. या सगळ्या गोष्टींवर भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं आहे.
हेही वाचा…“हरणाऱ्या नाही तर जिंकणाऱ्या जागा हव्यात”, वंचितचं घोंगड महाविकास आघाडीपुढे पुन्हा अडलं
भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की, मित्रांनो माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे पण या सगळ्या वाटचालीत आणि संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत. त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडवायचा आहे. सहकारी मित्रांनो रविवारी दिनांक १० मार्च रोजी सकाळी अकरा वाजत आपण सर्वांनी बांदल हायस्कुल चिपळून मध्ये एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलुया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया. मी आपली वाट पाहतोय.
हेही वाचा…रोहित पवारांना सर्वात मोठा धक्का, बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना ईडीकडून जप्त
दरम्यान, शिवसेना पक्ष फुट झाल्यानंतर कोकणातील अनेक नेते शिंदे गटात दाखल झालेत. बोटावर मोजता येतील इतकेच जण ठाकरेंसोबत राहिले. यामध्ये भास्कर जाधव यांचा नाव सर्वात वरती आहे. यातच कोकणात जाधव यांना भाजपकडून त्रास दिला जात असल्याचं काही घटनांवरून दिसत आहे. यावरून आता जाधव यांनी कार्यकर्त्यांना एकत्रित बोलवलं आहे. आता यावेळी जाधव काय बोलणार आणि काय भूमिका घेणार हे आता उद्याच स्पष्ट होणार आहे. ?
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसने लोकसभेसाठी जाहीर केले ३९ उमेदवार, राहुल गांधी यांच्यासह नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“चर्चा कोणतीही होवो, माझं तिकीट कन्फर्म,” संजय मंडलकींचा कोल्हापुरच्या जागेवर दावा
हेही वाचा“शिंदे अन् अजित पवार गटाचा राजकीय अंत निश्चित, भाजप ४८ जागांवर निवडणुक लढवेल”
हेही वाचा…आढळरावांची निवडणुकीतून माघार ? शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट
हेही वाचा..“मी महादेवाचा भक्त..तिसरा डोळा उघडेल तेंव्हा..,”कारखान्यावरील कारवाईनंतर रोहित पवारांचा कडक इशारा