औरंगाबाद : 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएम आणि वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापुर्वीही शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी अशाच प्रकारचा आरोप केला होता. त्यामुळे तो वाद आता पुन्हा चर्चेत येण्याची शक्यताल वर्तवली जात आहे.
“इतिहास विकुन नाही तर शिकुन वर आलोय”; सदाभाऊंचा अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर
इतके पैसे आले कुठुन ? असा सवाल करत लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला 1 हजार कोटी रूपये दिले होते. असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर केला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणुक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात. हे पैसे आले कुठुन असा सवालही त्यांनी केला आहे.
“राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज”
इडीला घाबरायचे नाहीत. इडीच्या चालबाजी कशा असतात, मला सर्व काही माहित आहे. मी त्या कमिटीवर होतो. फक्त घाबरव्याचे, बोलायचे आणि फक्त शिवसेनेच्या लोकांना दाबायचे असेही ते म्हणाले. वंचित आणि एमआयएम या दोन्ही पार्टी भाजपच्या बी टीम असल्याचा शिवसेनेकडून अनेकदा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रकांत खैऱ्यांच्या आरोपावर भाजप काय प्रतिक्रिया देणार ते आता पहावं लागणार आहे?
पाठीमागे लागलेला शनी घालवण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करणार ; नवनीत राणा
दरम्यान, शिवसेना नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असताना त्यांना आता चौकशीसाठी देखील बोलवले जात आहे. त्यामुळेच शिवसेनेने आता भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
Read also:
- “बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम”; शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
- “साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, मग हा रिसॉर्ट कुणाचा”? सोमय्यांचा अनिल परबांना सवाल
- “मुख्यमंत्र्यांनी मान राखला नाही, असं बोलणं चुकीचं”; शाहु महाराजांचं गोप्यस्फोट
- माझ्या वडिलांचा आदरच करतो, ते जे बोलले त्यावर..; शाहु महाराजांच्या वक्तव्यवर संभाजी राजेंची प्रतिक्रिया
- पालकमंत्री बदलने म्हणजे बाजारातला भाजीपाला आहे का? उजनी धरण्याच्या पाण्यावरून भरणे भडकले