सोलापुर : एक काळ असा होता, देशात उत्तर प्रदेशमध्ये साखर धंदा प्रथम क्रमांकावर होता. महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशमध्ये अधिक कारखाने आहेत. पण यंदा निसर्गाचा असहकार झाला व इतर कारणांमुळे उत्तर प्रदेश मागे पडला. साखरेचे उत्पादन करायला यंदा महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य बनले. याचे पूर्ण श्रेय ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यातील कामगारांना द्यावे लागेल. असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल इस्लामपुर येथे मांडले. राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे साखर कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
“राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज”
साखरेचा धंदा एकेकाळी ऊसापासून साखर करण्यापर्यंतचा होता. अगदी सुरुवातीला जे कारखाने निघाले, ते खासगी होते. वालचंद नगरचा कारखाना तुम्हाला माहीत असेल. या कारखान्यानंतर ऊसाच्या धंद्याला एक नवीन दृष्टिकोन आला. अनेक वर्ष गुळ करणाऱ्या शेतकऱ्यांनी खासगी कारखानदारी बघितल्यानंतर आपणही काही केले पाहिजे, हा विचार केला. सुदैवाने धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पद्मश्री विठ्ठलराव विखे अशी दूरदृष्टी असलेले लोक आपल्याला नगर जिल्ह्यातून मिळाले आणि पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर येथे झाला. त्यानंतर कारखानदारी प्रचंड वाढल्याचे चित्र आपण पाहिले. वसंतराव पाटील, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, तात्यासाहेब कोरे अशा अनेक लोकांनी या कामात योगदान दिले. अनेकांची नावे घेता येतील. या लोकांनी कारखानदारी उभी करून नेकीने ते चालविले. आज कारखानदारीमध्ये गुणात्मक बदल झाला आहे. एकेकाळी नुसती साखर एके साखर हाच कारखाना होता. आज त्याठिकाणी साखर, डिस्टिलरी, इथेनॉल, वीज तयार केली जात आहे.
पाठीमागे लागलेला शनी घालवण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करणार ; नवनीत राणा
महाराष्ट्रात एकेकाळी सर्वात मोठा धंदा कापडाचा होता. मुंबईत १२० कापड गिरण्या होत्या. त्यात जवळपास दोन लाख कामगार काम करायचे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमधून लोक या कारखान्यात काम करायचे. आज मुंबईत फक्त एक गिरणी शिल्लक आहे. गिरणगावातील गिरण्यांच्या जागेवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. गिरणगांवात असलेला कष्टकरी कामगार आज तिथे आढळत नाही. मात्र अशा परिस्थितीतही ऊसाचा धंदा टिकून आहे आणि तो वाढतोय. त्याचे मोठे श्रेय त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना द्यावे लागेल. यात माझ्या मनात शंका नाही. आज साखरेच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अनेक अडचणी आहेत, त्यावर मार्ग काढण्यासाठी आपण संस्था काढल्या आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसारखी संस्था स्थापन केली, तिथून मार्गदर्शन केले जाते. याचा लाभ देशातील साखर धंद्याला होतो. मघाशी बाळासाहेब पाटील यांनी बोलताना सांगितले की, आज कारखान्यामध्ये काम करण्यासाठी तांत्रिक कामगार मिळत नाही. म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये त्याचे स्वतंत्र शिक्षण आपण सुरू करत आहोत. शक्य तो कारखान्यात कामगार म्हणून काम करणाऱ्यांच्या दुसऱ्या पिढीला प्राधान्याने त्यात संधी दिली जाईल.
“मुख्यमंत्र्यांवर बोलले की 5-10 ठिकाणी तक्रार, अन् पंतप्रधानांविरूद्ध बोलले की त्यांचा सन्मान”
एक नवीन प्रश्न निर्माण झालाय. बंद पडलेल्या कारखान्याचे काय करायचे हा प्रश्न मोठा बनलाय. महिनोन्महिने कामगारांचे पगार थकलेत. कारखान्यातील मशिनरी गंजून जायला लागली. त्याकडे कुणी बघत नाही, मशिनरीच्या पार्ट्सची चोरी होते. त्यामुळे बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काम काही लोक करतात. मला स्वतःला असं वाटतं या गोष्टीचा विचार करावा लागेल. जे कारखाने सुरू करणे शक्य आहे, ते सुरू करावे लागतील. बंद का पडले, याच्या खोलात जावे लागेल. कारखाना जसा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तसा तो तिथे काम करणाऱ्या कामगारांसाठी देखील महत्त्वाचा आहे. बंद पडलेल्या कारखान्यांचा निकाल लावावा लागेल. याकडे लक्ष देणारी यंत्रणा निर्माण करावी लागेल. सहकार मंत्री आणि कामगार मंत्री यांनी पुढाकार घेऊन साखर आयुक्त, कामगार आयुक्त, कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि आवश्यकता असल्यास मला बोलावून बंद पडलेल्या कारखान्यांची कारणमीमांसा करून खोलात जाऊया. ज्याप्रकारे कापड गिरण्या पडून गिरणगाव भकास झाले, त्याप्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन या पद्धतीने संकटात टाकून चालणार नाही. त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कामगारांचे थकित पगार. दहा दहा महिने, तर काही कारखान्यात वर्ष दोन वर्ष वेतन मिळालेले नाही. लोकांनी कसं जगायचं? म्हणून मी जी कमिटी सांगितली, त्यात थकित वेतनाचाही विचार करून त्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे.
Read also:
- “साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, मग हा रिसॉर्ट कुणाचा”? सोमय्यांचा अनिल परबांना सवाल
- “मुख्यमंत्र्यांनी मान राखला नाही, असं बोलणं चुकीचं”; शाहु महाराजांचं गोप्यस्फोट
- माझ्या वडिलांचा आदरच करतो, ते जे बोलले त्यावर..; शाहु महाराजांच्या वक्तव्यवर संभाजी राजेंची प्रतिक्रिया
- पालकमंत्री बदलने म्हणजे बाजारातला भाजीपाला आहे का? उजनी धरण्याच्या पाण्यावरून भरणे भडकले
- “इतिहास विकुन नाही तर शिकुन वर आलोय”; सदाभाऊंचा अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर