मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर या अर्थसंकल्पावर सगळ्यांचं लक्ष लागून होतं. यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य असल्याचं म्हटलं आहे. तसेच अनेक राज्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.
आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
यंदाच्या अर्थसंकल्पात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये देण्यात येणार असुन याचा फायदा राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. 6 मार्च 2020 रोजी विकासाची पंचसुत्री कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील शेती विकास झाला असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयनची होणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. महाराष्ट्राची अस्मिता स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या नावाने छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार देखील देण्यात येणार आहे.
मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे
कोराना महामारीमुळे देशात मोठं संकंट उभं केलं होतं. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये पंचसुत्री कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे. यावेळी व्याज सवलत योजनेअंतर्गत पीक कर्जात मोठी वाढ केली आहे. तसेच ये वर्ष महिला, शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येणार आहे. तसेच यावर्षी खरीप व रब्बी हंगाम शेतमाल खरेदी अंतर्गत विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाला 406 कोटी रूपये देखील दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
Read also:
- देवेंद्र फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात! गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी होईल, त्यांनी भाजपसोबत यावे रामदास आठवले
- भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही! अमोल मिटकरींची भाजपवर खरमरीत टीका
- महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ, महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ : देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्रातील सरकार लवकरच पडणार! काॅंग्रेस खासदार कुमार केतकर यांचं वक्तव्य